शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये कोरोनाचा हाहाकार फोफावणाऱ्या डेंग्यूनेही पत्करली हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात ...

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात डेंग्यूचा आढावा घेतल्यास २८८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. २०१२ मध्ये दोन तर २०१३ मध्ये ३ अशा एकूण पाच जणांचा बळी गेल्यानंतर सातत्याने डेंग्यूचे सर्वेक्षण सुरू आहे. यातून २०१९ हे वर्ष वगळता इतर वर्षात मात्र डेंग्यू नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची संख्या अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. २०२० या संपूर्ण वर्षात केवळ ३०१ संशयित रुग्ण आढळून आल्याचे हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातील आठ जण डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आले होते. जिल्ह्यात डेंग्यू बाधितांची संख्या अचानक कमी झाली असली तरीही विभागाकडून सर्वेक्षण मात्र सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. रवींद्र ढोल यांच्याकडून देण्यात आली आहे.

किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकतात अडचणी

एडिस डासाने चावा घेतल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवस विविध लक्षणे जाणवल्यास डेंग्यूची तपासणी करुन घेण्याचे हिवताप विभागाकडून सूचित केले जाते. यात संपूर्ण अंगदुखी आणि सांधेदुखीची तक्रार समोर येते.

बाधित रुग्णाला वारंवार ताप येण्यास सुरुवात होते. तापाचे प्रमाण अधिक असल्यास तातडीने डेंग्यूची चाचणी करण्याचा सल्ला विभागाकडून देण्यात येतो. तापादरम्यान डोळ्यांच्या खोबणीत दुखण्याचे प्रमाणही जाणवते.

ताप आणि अंगदुखी जाणवत असतानाच पाच ते सात दिवस अंगावर लाल रंगाचे चट्टे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यातून डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे तातडीने योग्य ते उपचार घेतल्यास डेंग्यू बरा होतो.

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मात्र सातत्याने आढळून येतात. २०१९ या वर्षात ताप असलेले २००२ संशयित रुग्ण समोर आले होते.

डेंग्यू नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी आरोग्य सेवक, हिवताप कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात येते. या पथकांकडून घरोघरी भेटी देत, पाहणी करण्यात येते. यावेळी साठा केलेल्या पाण्यात एडीस डासाची पैदास करणाऱ्या अळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. अळ्या आढळून आल्यास त्याठिकाणी ॲबेटिंग करण्याचा उपक्रम पार पाडण्यात येतो. जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने यावर कामकाज करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.