शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२०२० मध्ये कोरोनाचा हाहाकार फोफावणाऱ्या डेंग्यूनेही पत्करली हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात ...

जिल्ह्यात डेंग्यू सदृश आजारांवर मात करण्यासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येते. २०१२ ते २०२० या वर्षात डेंग्यूचा आढावा घेतल्यास २८८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. २०१२ मध्ये दोन तर २०१३ मध्ये ३ अशा एकूण पाच जणांचा बळी गेल्यानंतर सातत्याने डेंग्यूचे सर्वेक्षण सुरू आहे. यातून २०१९ हे वर्ष वगळता इतर वर्षात मात्र डेंग्यू नियंत्रणात असल्याचे दिसून आले होते. एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मात्र डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याची संख्या अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. २०२० या संपूर्ण वर्षात केवळ ३०१ संशयित रुग्ण आढळून आल्याचे हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यातील आठ जण डेंग्यू पाॅझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार पूर्ण करण्यात आले होते. जिल्ह्यात डेंग्यू बाधितांची संख्या अचानक कमी झाली असली तरीही विभागाकडून सर्वेक्षण मात्र सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. रवींद्र ढोल यांच्याकडून देण्यात आली आहे.

किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकतात अडचणी

एडिस डासाने चावा घेतल्यानंतर साधारण पाच ते सहा दिवस विविध लक्षणे जाणवल्यास डेंग्यूची तपासणी करुन घेण्याचे हिवताप विभागाकडून सूचित केले जाते. यात संपूर्ण अंगदुखी आणि सांधेदुखीची तक्रार समोर येते.

बाधित रुग्णाला वारंवार ताप येण्यास सुरुवात होते. तापाचे प्रमाण अधिक असल्यास तातडीने डेंग्यूची चाचणी करण्याचा सल्ला विभागाकडून देण्यात येतो. तापादरम्यान डोळ्यांच्या खोबणीत दुखण्याचे प्रमाणही जाणवते.

ताप आणि अंगदुखी जाणवत असतानाच पाच ते सात दिवस अंगावर लाल रंगाचे चट्टे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. यातून डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे तातडीने योग्य ते उपचार घेतल्यास डेंग्यू बरा होतो.

जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी असले तरी डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मात्र सातत्याने आढळून येतात. २०१९ या वर्षात ताप असलेले २००२ संशयित रुग्ण समोर आले होते.

डेंग्यू नियंत्रणासाठी जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने मोहिमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी आरोग्य सेवक, हिवताप कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांची नियुक्ती करण्यात येते. या पथकांकडून घरोघरी भेटी देत, पाहणी करण्यात येते. यावेळी साठा केलेल्या पाण्यात एडीस डासाची पैदास करणाऱ्या अळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. अळ्या आढळून आल्यास त्याठिकाणी ॲबेटिंग करण्याचा उपक्रम पार पाडण्यात येतो. जिल्हा हिवताप विभागाकडून सातत्याने यावर कामकाज करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात नवापूर, नंदुरबार आणि शहादा तालुक्यात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.