शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या मोहिमेने गती घेणे आवश्यक आहे. अधीक पथकांची नियुक्ती करून या मोहिमेचा उद्देश सफल करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आठवडाभरात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे.       नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा जायबंदी व्हावे लागले आहे.  एका बालिकेचा देखील त्यात बळी गेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप पहाता पालिकेने लागलीच भटके कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेतली. परंतु सध्या सुरू असलेली मोहिम नावालाच असल्याचे चित्र आहे. आवश्यक साधनांचा अभाव, प्रशिक्षीत नसलेले कर्मचारी यामुळे आठ दिवसात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची दहशत अद्यापही शहरात कायम आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर मोठी दहशत असते.  

एक वाहन आणि १२ कर्मचारींवर मदार... पालिकेकडे कुत्रे पकडण्याची आवश्यक ती साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अर्थात दोरीचा फास तयार करून कुत्र्यांचा पाठलाग करून ते पकडले जात आहे. सध्या एक वाहन आणि १२ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. 

६० किलोमिटर लांब जंगलात सोडलेशहरातून पकडलेल्या कुत्र्यांना जंगलात सोडले जात आहे. शहरापासून किमान ५० ते ६० किलोमिटर लांब पालिकेचे वाहन जात आहे. जेथे गाव किंवा वस्ती आसपास नाही अशा जंगलाच्या भागात या कुत्र्यांना आतापर्यंत सोडण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. येत्या काळात पथक वाढविण्यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. 

या प्रमुख भागांत त्रास : मांस विक्री ज्या भागात होते त्या भागात सर्वाधिक त्रास भटक्या कुत्र्यांचा आहे. याशिवाय दाटीवाटीच्या वस्ती, शहरातील मोकळ्या भागातील वस्ती यासह सार्वजनिक चौकांमध्ये भटक्या कु्त्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी स्वच्छता ठेकेदाराच्या माध्यमातून पथक तयार करण्यात आले आहे. प्राणी संरक्षण अधिनियमान्वये त्यांचा छळ करणे किंवा ठार मारता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडावे लागत आहे. -रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.

पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू केली असली तरी त्याला गती येणे आवश्यक आहे. कुत्रे पकडतांना ते एका भागातून दुसऱ्या भागात पळून जातात. त्यामुळे दुसऱ्या वसाहतीमधील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.- जयेश पाटील, नागरिक, नंदुरबार.