शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

नंदुरबारातील २०० भटक्या कुत्र्यांचा मुक्काम जंगलात हलवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   भटक्या कुत्र्यांचे दहशत शहरवासीयांच्या मनातून कमी होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या मोहिमेने गती घेणे आवश्यक आहे. अधीक पथकांची नियुक्ती करून या मोहिमेचा उद्देश सफल करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आठवडाभरात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा ठेकेदाराने केला आहे.       नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांचा जायबंदी व्हावे लागले आहे.  एका बालिकेचा देखील त्यात बळी गेल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप पहाता पालिकेने लागलीच भटके कुत्रे पकडण्याची मोहिम हाती घेतली. परंतु सध्या सुरू असलेली मोहिम नावालाच असल्याचे चित्र आहे. आवश्यक साधनांचा अभाव, प्रशिक्षीत नसलेले कर्मचारी यामुळे आठ दिवसात जवळपास २०० कुत्रे पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरी भटक्या कुत्र्यांची दहशत अद्यापही शहरात कायम आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच वावरावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर मोठी दहशत असते.  

एक वाहन आणि १२ कर्मचारींवर मदार... पालिकेकडे कुत्रे पकडण्याची आवश्यक ती साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने अर्थात दोरीचा फास तयार करून कुत्र्यांचा पाठलाग करून ते पकडले जात आहे. सध्या एक वाहन आणि १२ कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. 

६० किलोमिटर लांब जंगलात सोडलेशहरातून पकडलेल्या कुत्र्यांना जंगलात सोडले जात आहे. शहरापासून किमान ५० ते ६० किलोमिटर लांब पालिकेचे वाहन जात आहे. जेथे गाव किंवा वस्ती आसपास नाही अशा जंगलाच्या भागात या कुत्र्यांना आतापर्यंत सोडण्यात आल्याचे ठेकेदाराने सांगितले. येत्या काळात पथक वाढविण्यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. 

या प्रमुख भागांत त्रास : मांस विक्री ज्या भागात होते त्या भागात सर्वाधिक त्रास भटक्या कुत्र्यांचा आहे. याशिवाय दाटीवाटीच्या वस्ती, शहरातील मोकळ्या भागातील वस्ती यासह सार्वजनिक चौकांमध्ये भटक्या कु्त्र्यांचा सर्वाधिक त्रास आहे. रात्रीच्या वेळी सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 

मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी स्वच्छता ठेकेदाराच्या माध्यमातून पथक तयार करण्यात आले आहे. प्राणी संरक्षण अधिनियमान्वये त्यांचा छळ करणे किंवा ठार मारता येत नाही. त्यामुळे त्यांना पकडून जंगलात सोडावे लागत आहे. -रत्ना रघुवंशी, नगराध्यक्षा, नंदुरबार.

पालिकेने कुत्रे पकडण्याची मोहिम सुरू केली असली तरी त्याला गती येणे आवश्यक आहे. कुत्रे पकडतांना ते एका भागातून दुसऱ्या भागात पळून जातात. त्यामुळे दुसऱ्या वसाहतीमधील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे.- जयेश पाटील, नागरिक, नंदुरबार.