शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

अक्कलकुवा तालुक्यात दोन महिन्यात २०० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून ...

राज्यासह जिल्ह्यात यंदा कोरोनामुळे नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना बळींचा आकडा हा ७५० च्या पुढे गेला आहे. यातून भीती वाढून अनेकांनी धसका घेतला होता. यातून ज्येष्ठ नागरिकांच्या चिंता वाढून त्यांना वृद्धापकाळात हृदयविकाराचे धक्के सहन न झाल्याने त्यांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी तालुक्यात आहेत. याबाबत तालुक्यातील विविध गावांमधील मयतांच्या नातलगांनी केलेल्या मृत्यू दाखल्यांच्या नोंदी तपासल्या असता, १८९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात खापर, घंटाणी, कंकाळी, काकरपाडा, मोलगी, सोरापाडा, अक्कलकुवा, ब्राह्मणगाव, मालपाडा, ईटवाई, कोयलीविहीर, ओहवा, गव्हाळी, डोडवा, नवापाडा, सिंगपूर बुद्रूक, जानीआंबा, मांडवीआंबा, खटवाणी, आंबाबारी, डनेल, तालंबा, काकडीआंबा, रामपूर, शेंदवण, बिजरीगव्हाण, बेडाकुंड, मक्राणीफळी, अक्कलकुवा या गावांमध्ये झालेल्या मृत्यूच्या या नोंदी आहेत. वृद्धापकाळाने मयत झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर दीर्घ आजार, मधुमेह, टीबी, जुना दमा यासह इतर आजारांनी मयत झालेल्यांची संख्या समोर आली आहे. तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील विविध भागात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे ठरत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य सोयी ह्या यथातथाच असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी नसल्याचे प्रकार कायम समोर आले आहेत. यातून आता मृत्यूचा दर वाढला असल्याने त्याचा योग्य त्या पद्धतीने शोध घेत तालुकावासीयांना दिलासा देण्याची गरज आहे. विविध आजारांनी हे मृत्यू झाले असले तरी त्या आजारांवर उपचार करता येत नसल्याने अनेक जणांचा घरीच मृत्यू आहे. यामुळे आरोग्य विभागाने गंभीर आजारी रुग्णांची काळजी घेण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षा आहे.