शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रधानमंत्री आदर्श गावांतर्गत ६७८ गावांना मिळणार प्रत्येकी २० लाख

By मनोज शेलार | Updated: September 9, 2023 18:42 IST

नंदुरबार प्रकल्प अंतर्गत ३४५ गावांची निवड झाली असून यासाठी साधारणत: सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे

मनोज शेलार/नंदुरबार

नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्प अंतर्गत असलेल्या ६७८ गावांची केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदी आदर्श गाव विकास योजनेंतर्गत निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात १४०० कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. यापैकी सहाशे कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक गावात २० लाख ३८ हजार रुपये खर्चाची विकास कामे केली जाणार आहेत. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा आदर्श गाव या संकल्पनेवर आधारित एकात्मिक आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी प्रधानमंत्री आदी आदर्श गाव विकास योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही योजना २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राबविली जाणार आहे. निधी मंजूर करण्यात आला असून तो हस्तांतर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या निधी अंतर्गत लाभार्थी गावांना मूलभूत सुविधा व विकास कामे करता येणार आहे.

नंदुरबार प्रकल्प अंतर्गत ३४५ गावांची निवड झाली असून यासाठी साधारणत: सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पैकी तीनशे कोटी रुपये निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यात नंदुरबार तालुक्यातील ८९, शहादा तालुक्यातील १११ व नवापूर तालुक्यातील १४५ गावांचा समावेश आहे. तळोदा प्रकल्पांतर्गत ३३३ गावांची निवड झाली असून यासाठी सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. पैकी ३०० कोटी रुपये निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यात तळोदा तालुक्यातील ७२ गावे, अक्कलकुवा तालुक्यातील १४२ व अक्राणी तालुक्यातील ११९ गावांचा समावेश आहे.

 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारprime ministerपंतप्रधान