लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात आॅक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत 'क्यार' आणि 'महा' चक्रीवादळ व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी राज्य शासनाने मदत जाहीर केली होती. त्यानुसार मदत वाटपासाठी दुसऱ्या टप्प्यात १३ कोटी ३४ लाख ८७ हजार ४१० रुपयांचा निधी नंदुरबार जिल्ह्याला प्राप्त झाला असून तो तालुक्यांना वितरित करण्यात आला आहे. यापूर्वी तीन कोटी ६२ लाख २१ हजार रुपये वितरित करण्यात आले होते.राज्यामध्ये अवकाळी झालेल्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एकत्रित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार एकूण १६ कोटी ९७ लाख आठ हजार ४१० रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण तालुक्यांना करण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात नवापुर तालुक्यास २० लाख ,शहादा १७ लाख, तळोदा दोन लाख सात हजार ५००, अक्कलकुवा दोन कोटी ६४ लाख ५० हजार, तर अक्राणीसाठी दहा कोटी ३१ लाख २९,९१० इतका निधी बाधीत शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी तहसिलदाराना वितरीत करण्यात आला आहे.आपदग्रस्त शेतकºयांना शेतीपिकांसाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर तर फळबागांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर दराने दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे.बाधित शेतकºयांच्या बाधित खात्यात अनुदानाची रक्कम जमा करणयात यावी. मदतीच्या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. यासाठी सहकार विभागाने योग्य आदेश निर्गमित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
नुकसान भरपाईचे १३ कोटी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:53 IST