शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यातील १९५ गावे खरीप अनुदानापासून वंचित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:59 IST

नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव ...

नंदुरबार : जून ते सप्टेंबर २०१८ या काळात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने ५० पैश्यांच्या आत पैसवारी असतानाही धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील १९५ गावांना दुष्काळ अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे़ या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर नसून केवळ दुष्काळसदृश स्थिती असल्याचा अहवाल असल्याने येथे केवळ सवलती लागू होणार आहे़२०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळीसदृश्य परिस्थिती असल्याने राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला होता़ यात नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोेदा या चार तालुक्यांचा समावेश होता़ चारही तालुक्यातील पर्जन्यमान आणि पीककापणी प्रयोगांच्या आधारे शासनाने हा दुष्काळ जाहिर केला होता़ याउलट धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्थिती होती़ पाऊस ७५० मिलीमीटरपेक्षा कमी होऊनही येथील पिकांची स्थिती सुरुवातीला काही प्रमाणात ठीक होती़ परंतू नंतर पाऊस न आल्याने येथील स्थिती दयनीय झाली़ याबाबत दोन्ही तालुक्यात पाठपुरावा करण्यात येत होता़ याची दखल घेत नोव्हेंबर २०१८ मध्ये अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा, खापर आणि अक्कलकुवा या तीन मंडळात दुष्काळ घोषित करण्यात आला होता़ यानंतर डिसेंबर अखेरीस अंतिम पैसेवारी घोषित झाल्यानंतर धडगाव ९९ तर अक्कलकुवा तालुक्यातील तीन मंडळातील ९६ गावे ही दुष्काळसदृश असल्याचे समोर आले होते़ यातून लोकोग्राहस्तव शासनाने दुष्काळसदृश घोषित केले होते़ यातून येथे आठ प्रकारच्या सवलती जाहिर झाल्या असल्या तरी या १९५ गावांमध्ये ‘दुष्काळ’ नसल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून देय असलेले खरीप अनुदान मिळणार नसल्याची माहिती आहे़ दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य या दोन शब्दातील खेळात दुर्गम भागातील शेतकरी भरडला जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे़