शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा निर्मितीच्या 19 वर्षानी नंदुरबारात बहुप्रतिक्षीत आयकर कार्यालय अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी.शुक्ला यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या आयकर भवन कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. यामुळे आता जिल्ह्यातील करदात्यांची धुळे येथे होणारी फिरफिर थांबणार आहे.शहरातील रघुवंशीनगर भागातील भारती भवन येथे हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे क्षेत्राचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त ए.सी.शुक्ला यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला. यावेळी बोलतांना आयुक्त शुक्ला यांनी सांगितले. देशात आजही प्रामाणिकपणे आयकर भरणारे अनेकजण आहेत. परंतु काहीजण त्यापासून पळ काढतात. वास्तविक या करातूनच देशाची अर्थव्यवस्था चालते. कल्याणकारी योजनांना आणि देशाच्या रक्षण करणा:या सैन्यदलाच्या खर्चासाठी आयकराचाच पैसा सरकारला वापरावा लागतो. त्यामुळे कर चोरी करणे हा एक प्रकारे अपराधच आहे. त्यामुळे प्रत्येक करदात्याने प्रामाणिकपणे कर भरणा करून देशाप्रती आपली निष्ठा राखावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील करदात्या जनतेसाठी हे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दर बुधवारी पूर्व परवाणगीने अधिका:यांना भेटता येईल अशी सोय राहणार आहे. टप्प्याटप्याने अधिकारी व कर्मचा:यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आयकर आपल्या दारी या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिरिष चौधरी, नाशिकचे मुख्य आयकर आयुक्त असिमकुमार, ठाण्याचे एन.एन.मिश्रा, प्रधान आयकर आयुक्त शंकरलाल मिना, औरंगाबादचे एस.डी.श्रीवास्तव, के.पी.सी.राव, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धुळ्याचे आयकर आयुक्त लाला फिलीप्स, पृथ्वीराज रघुवंशी, किशोरभाई वाणी, आयकर आयुक्त मनोज गौतम, हेमंत लेऊवा, मोहित मृणाल, राजीव केसरवाणी यांच्यासह कर सल्लागार, व्यापारी व करदाते उपस्थित होते. अमित अग्रवाल, संतोष नानकाणी, मनिषा लुणावत, किशोरभाई वाणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्रीराम देशपांडे यांनी केले. आभार पी.पी.महाजन यांनी मानले.