शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जिल्ह्यातील 24 हजार शेतकऱ्यांचे 189 कोटी रूपये कर्जमाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 11:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार  ७९० शेतकऱ्यांचे १८९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार  ७९० शेतकऱ्यांचे १८९ कोटी ४१  लाखाचे कर्ज माफ झाले आहे. यामुळे नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने  २०२१ च्या खरीप हंगामात शेतक-यांना बँकांकडून कर्ज घेत शेती करणे अधिक सोपे होणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. यात शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.             राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील २४ हजार  हजार ७९० शेतकऱ्यांचे १८९ कोटी ४१  लाखाचे कर्ज माफ झाले आहे. यामुळे नव्याने कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने  २०२१ च्या खरीप हंगामात शेतक-यांना बँकांकडून कर्ज घेत शेती करणे अधिक सोपे होणार आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला होता. पूर्वीचे कर्ज थकल्याने लहान शेतकऱ्यांना बियाणे आणि खतासाठी नवीन कर्ज घेणे शक्य नव्हते. यात शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.              गेल्या वर्षी राज्य शासनाकडून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९  या काळात शेतक-यांनी  घेतलेले  थकीत असलेले २ लाखापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज व अल्पमुदत पीक पुनर्गठित कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. यानुसार  जमीनधारणेचे क्षेत्र विचारात न घेता कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. केवळ आधार प्रमाणिकरण करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात मोहिम स्तरावर रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे बँकेतून नव्याने कर्ज घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले. यांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कर्जमुक्त झालेल्या आणि नव्याने सभासद झालेल्या २५ हजार ३६२ शेतकऱ्यांना खरीप हंगामा २०२० या काळात २७५ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. तसेच सोबत  १ हजार १४९ शेतक-यांना १४  कोटींचे पीक कर्ज रब्बी हंगामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.            शासनाकडून करण्यात आलेल्या कर्जमुक्तीमुळे शेतक-यांना येत्या काही वर्षात नव्याने पीक कर्ज घेण्यास घेण्यात अडचणी येणार नसल्याचे बोलले जात आहे. बँकांकडून येत्या काळात वेळेत कर्जवाटप करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

मुदतीत ११ हजार शेतक-यांनी परत केले कर्ज               एकीकडे कर्जमुक्ती मिळाली असताना दुसरीकडे मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत ११ हजार शेतक-यांना लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पीक कर्ज घेत वेळेत परत करणा-या शेतक-यांना १ लाखापर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत देण्यात येते. २०१९-२० या वर्षात ११ हजार ७०९ शेतक-यांना १ कोटी ८१ लाख रूपयांच्या सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.  यांतर्गत नंदुरबार तालु्क्यातील ३ हजार ३ शेतक-यांना ४४ लाख ३२ हजार रूपये, शहादा तालुक्यात  ५ हजार ७२२ शेतक-यांना ९३ लाख ५४ हजार, नवापूर तालुक्यात  १ हजार ७३० शेतक-यांना २४ लाख ५२ हजार,  तळोदा येथे १ हजार १८ शेतक-यांना १७ लाख ६६ हजार, अक्कलकुवा ७३ शेतक-यांना ६५ हजार तर धडगाव तालुक्यात १६३ शेतक-यांना ९५ हजार रूपयांच्या सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.