शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात १८ हजार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनाने १ एप्रिल पासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन ...

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनाने १ एप्रिल पासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला होता. या १५ दिवसांच्या कार्यकाळातच जिल्ह्यात १२ हजार २५१ नवीन कोरोनाबाधित समोर आले होते. दरम्यान १ एप्रिल ते एक मे या काळात जिल्ह्यात १७ हजार ७६८ नवीन बाधित रुग्ण समोर आले होते.

कमी अधिक प्रमाणात आढळणारे कोरोना रुग्ण आणि दिवसाला किमान एक असा मृत्यूदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरीपासून कोरोनाचा विस्फोट होण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला ५०० रुग्ण समोर येणे सुरु झाले. ही संख्या वाढत जाऊन आठवडाभरात दिवसाला १ हजारापर्यंत पोहोचली होती. यातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना करुनही रुग्ण संख्या घटत नसल्याने अखेर एक एप्रिलपासून १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केला होता. यानंतरही जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही वाढती राहून २५ हजाराच्या पार गेली होती. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ६११ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्यूदर हा १. ८ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत २९६ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अशी ही संख्या होती. परंतु ३१ मार्च ते १ मे या कालावधीत या एक महिन्यात जिल्ह्यात एकूण ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर तोच असला तरी त्याचा स्पीड रेट हा वाढला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याने वाढली प्रशासनाची चिंता, उपाययोजनांना गती

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात उसळल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एकूण ५८६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३५९ ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार तालुक्यात ४५, नवापूर ७६, शहादा १२५, तळोदा ६७, अक्कलकुवा २९ तर धडगाव तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना रुग्ण होते.

जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्येत नंदुरबार तालुक्यात १४ हजार १०७, शहादा ११ हजार १००, तळोदा ३ हजार ३७०, नवापूर ३ हजार ३९८, अक्कलकुवा ८०५ तर धडगाव तालुक्यात ७१० रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३३ हजार रूग्णांपैकी २५ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संचारबंदी काळातही कोरोनाबाधित वाढीस लागत असल्याचे प्रमुख कारण नागरिकांचा संपर्क कमी न होणे हेच असल्याचे सांगण्यात आले. यातून टेस्ट वाढल्याने रुग्ण समोर येत होते. ग्रामीण भागात मास्कचा वापर कमी असल्याचे दिसून येत होते. यातून प्रशासनाने लसीकरण व जनजागृतीचा वापर वाढवल्याने एप्रिलच्या अंतिम आठवड्यात रुग्णसंख्येला काही अंशी ब्रेक लागल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

या कारणांमुळे वाढली अन् घटली रुग्णसंख्या

जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही रुग्णसंख्या घटत नव्हती. उपचार मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ होत होती. यातून वाढलेले बेड, उपचारांसाठी रेमडेसिविरचे रेशनिंग, पुरेसा ऑक्सिजन यातून उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमुख कारण जिल्ह्यात बाहेरगावाहून येणारे प्रवासी असल्याचा दावा होत होता. प्रामुख्याने मध्यप्रदेशातून येणारे तसेच मोठ्या शहरातून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग होत होता.

लाॅकडाऊन आणि जिल्हाबंदी यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड अशा दोन्ही चाचण्या वाढवल्या असल्याने रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाल्याची माहिती दिली गेली आहे.