शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भगर-आमटीतून झाली १५० जणांना विषबाधा; रनाळेतील घटना, प्रकृती स्थीर

By मनोज शेलार | Updated: February 21, 2024 13:18 IST

मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मनोज शेलारनंदुरबार : रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रात्री आयोजित भंडारा-महाप्रसादाच्या कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याने दीडशेपेक्षा अधीक जणांना त्रास जाणवू लागला होता. त्यातील १०० पेक्षा अधिक जणांवर उपचार करून लागलीच घरी सोडून देण्यात आले तर ३० जणांवर रनाळे ग्रामिण रुग्णालयात व २५ जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, रनाळे येथे मंगळवारी रात्री बाळूमामा यांच्या नावाने भंडारा-महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी भगर व आमटी व दूधाचा प्रसाद भाविकांना देण्यात आला. महाप्रसाद घेण्यासाठी गावासह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीड ते दोन वाजेपासून अनेकांना त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांनी रनाळे ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. पहाता पहाता दीडशेपेक्षा अधिक रुग्ण दाखल झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. लागलीच रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. काही जणांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री २५ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रनाळे आरोग्य केंद्रात १०० पेक्षा अधिक जणांवर स्थानिक ठिकाणी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. तर ३० जणांवर रनाळे येथेच उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारhospitalहॉस्पिटल