शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

‘एसटी’ प्रमाणपत्र पडताळणी समितीला 15 दिवसांची मुदत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: November 21, 2017 12:56 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आह़े यामुळे ही याचिका दाखल करणा:या 78 याचिकाकत्र्याच्या प्रकरणांवर केलेली कार्यवाही किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी समितीला औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसांची मुदत दिली आह़े त्यामुळे येत्या 15 दिवसात ...

ठळक मुद्देमंत्रिमंडळ उपसमितीकडून 1 महिन्यात अभिप्राय
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्यात आली आह़े यामुळे ही याचिका दाखल करणा:या 78 याचिकाकत्र्याच्या प्रकरणांवर केलेली कार्यवाही किंवा आपले म्हणणे मांडण्यासाठी समितीला औरंगाबाद खंडपीठाने 15 दिवसांची मुदत दिली आह़े त्यामुळे येत्या 15 दिवसात समिती याबाबत काय कार्यवाही करते याकडे लक्ष लागले आह़ेकाही वर्षापूर्वी टोकरे कोळी यांची 65 व ठाकूर जमातींची 13 असे एकूण 78 प्रकरणे एका संघटनेच्या अध्यक्षामार्फत एकगठ्ठा समितीत दाखल करण्यात आली होती़ परंतु दरम्यानच्या कालावधीत समितीत सहआयुक्त हे पद प्रभारी असल्याने या प्रलंबित प्रकरणांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप याचिकाकत्र्याकडून करण्यात आला आह़े त्यामुळे न्यायालयाच्या सूचना असूनही समितीने त्यावर कारवाई केली नसल्याने समितीवर कोर्टाचा अवमान केल्याची याचिका आता दाखल करण्यात आली आह़े त्यामुळे ही याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने या प्रलंबित प्रकरणांचा निकालांबाबत 15 दिवसांच्या आत कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत़ दरम्यान, तत्कालीन प्रभारी सहआयुक्तांच्या कार्यकाळात ही प्रकरणे दाखल झाली होती़ त्यानंतर सहआयुक्तपदी येथे कुणीही आले नसल्याने ही प्रकरणे धुळखात पडली होती़ मंत्रिमंडळ उपसमितीकडे लक्ष.राज्य शासनाकडून आठ सदस्यीय मंत्रिमंडळ समितीचे गठण करण्यात आले आह़े रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतुद करण्यासाठी जात पडताळणी अधिनियमात बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्याच धर्तीवर अनुसूचित जमातीच्या 2003 च्या अधिनिमात सुधारणा करता येईल काय याचा अभिप्राय मागविला आह़ेसमितीने सकारात्मकता दाखत या अधिनियमात सुधारणा होऊ शकते असे अभिप्राय दिल्यास अनुसूचित जमाती समोरील अनेक वर्षाची समस्या सुटणार आह़े ठाकूर व टोकरे कोळी यांची सुमारे 4 हजार प्रलंबित प्रकरणांमधील साडेतिनशे प्रकरणे सहज निकाली लागणे शक्य होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे आता या उपसमितीच्या अभिप्रायावर सर्व अवलंबून असल्याचे म्हटले जात आह़े