शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धनपूर धरणाच्या पाटचारीसाठी दीड कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येत नव्हते. परंतु या प्रलंबित कामासाठी राज्य शासनामार्फत दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोड, बोरद व खेडले यासह अन्य गावांमधील तब्बल २७२ हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवठा होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तळोदा तालुका शेती समृद्ध असला तरी तालुक्यातील काही भागात उन्हाळी कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होत होती. यावर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तालुक्यातील नागरिकांमार्फत आंदोलने करण्यात आली. आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नसल्याने तालुक्यात पुन्हा कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती तयार करण्यात आली. या समितीमार्फत आमलाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, त्याची दखल घेत धनपूर येथे धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे या धरणाचे उद्घाटन २००८ मध्ये माजी उपसभापती दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले. परंतु परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यास आवश्यक असलेल्या पाचचारीचे काम झाले नव्हते. त्यामुळे काम पूर्ण होऊन सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकºयांना पाणी वाटप करण्यात आले नव्हते. त्यामळे मुबलक जलसाठा असूनही शेतशिवार कोरडे होते. उर्वरित कामांसाठी राज्य शासनामार्फत नुकतेच दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या मंजूर निधीतून सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.धरण परिसरातील ७० टक्के आदिवासी शेतकºयांचा जमिनी सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे त्यांची शेती बागायती होऊन विविध पिके घेता येतील. आर्थिकदृष्ट्य त्यांना प्रगती करता येणार आहे. शिवाय परिसरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतरांवर काही प्रमाणात नियंत्रण देखील आणता येणार आहे. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री तथा आदिवासी विकाम मंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी यांचे योगदान लाभले.धनपूर धरण सातपुडा पर्वतातून उगम पावणाºया निझरा या नदीवर बांधण्यात आले आहे. धनपूर धरण साकारावे म्हणून १९९६ पासून आजतागायत, मोर्चे, उपोषण, निवेदन, घेराव, रस्ता रोको आदी मार्गांनी आंदोलने केली. त्यानंतर सुमारे २५ वर्षानंतर शेतकºयांचे स्वप्नांना आकार मिळाला. धरणात मुबलक जलसाठा असूनही बांधापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. पाटचाºयांचे बांधकाम करणे आवश्यक आहे.