शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

१२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात १२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी दिवसभरात १२४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह आलेल्यात नंदुरबार येथे ३४, शहादा ३६, नवापूर ३७, तळोदा ११ तर अक्कलकुवा येथील चौघांचा समावेश आहे़ बाहेरील जिल्ह्यातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़कोरोनामुळे जिल्ह्यात आजवर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ९५० जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत़ मंगळवारी दुपारी नंदुरबार शहरातील राजेंद्र नगर, मेहतर वस्ती, वैशाली नगर, शारदा नगर, अजय नगर, दंडपाणेश्वर कॉलनी, नेहरु नगर, अरिहंत नगर याठिकाणी प्रत्येकी एक, तुलसी विहार येथे ४ तर तालुक्यातील रनाळे येथे ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता़ नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे एकाच दिवसात १७ रुग्ण आढळून आले आहेत़ तळोदा येथील खान्देशी गल्लीत २ तर गणपती गल्ली अणि श्रॉफ बाजार येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत़ शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे आणि सावखेडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यात आली होती़ दरम्यान रात्री उशिरा ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते़ यामुळे दिवसभरात १०० पेक्षा अधिक जणांचे रिपोर्ट पॉॅझिटिव्ह ठरले़दरम्यान मंगळवारी ५० रूग्ण बरे होवून घरी परतले होते़ सकाळी तळोदा येथील सात तर दुपारी जिल्ह्यातील विविध भागातील ४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले़ यातून जिल्ह्यात ८७७ रुग्ण उपचार घेत आहेत़ यात नंदुरबार येथील ३५५, शहादा २६४, तळोदा ९३, नवापूर १३०, अक्कलकुवा १२ आणि धडगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे़ बाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कोविड हॉस्पिटल, एकलव्य केअर सेंटर, सलसाडी ता़ तळोदा, मोहिदा ता शहादा या शासकीय उपचार कक्षांसह नंदुरबार शहरात दोन खाजगी कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहे़

मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वाघोदा शिवारातील ८७ वर्षीय वृद्धाचा तर खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रनाळे ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे़ पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये २१ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत़ खांडबारा येथे १८ आणि रनाळे येथे पाच रुग्ण आढळल्याने ग्रामीण भाग हॉटस्पॉट ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ यामुळे ग्रामीण भागात उपाययोजनांना गतीची गरज आहे़