शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

किनवटच्या जफरखान नगरवासीयांचे रस्त्यासाठी सहाव्या दिवशी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:19 IST

किनवट : किनवट शहरातील जफारखान नगरवासीयांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने तो मार्गी लावावा, ही मागणी घेऊन पुन्हा महिला-पुरुषांनी ...

किनवट : किनवट शहरातील जफारखान नगरवासीयांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने तो मार्गी लावावा, ही मागणी घेऊन पुन्हा महिला-पुरुषांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असूनही कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून यापूर्वी ११ डिसेंबर २०२० रोजी उपोषणाला महिला-पुरुष बसले होते; पण नगर परिषदेने सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येईल व संबंधित अधिनियमाच्या तरतुदी अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेतले होते. पण रस्ता मोकळा केलेला नसल्याने हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी घेऊन नसरीन असिफ खान, उशारेड्डी दयकलवार, रिजवान अकबर, विठ्ठल कावळे, शिवनंदा स्वामी, मंगल कावळे, सुनीता सुभाष, गोदावरी, पार्वती शंकर, नगमा शे खदिर, शकुंतलाबाई आदींनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मावळत्या वर्षात सुरू केलेले आमरण उपोषण नवीन वर्षात सुरू आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस असतानाही इकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे व संबंधितांचे साटेलोटे तर नाही ना? उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कोणत्याही अधिका-याने उपोषणस्थळाला भेट दिली नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असतानाही कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. मेलो तरी चालेल, असे उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम राबवून समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. इथे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणकर्त्याला बोलायला तयार नाही. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.