शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

किनवटच्या जफरखान नगरवासीयांचे रस्त्यासाठी सहाव्या दिवशी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:19 IST

किनवट : किनवट शहरातील जफारखान नगरवासीयांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने तो मार्गी लावावा, ही मागणी घेऊन पुन्हा महिला-पुरुषांनी ...

किनवट : किनवट शहरातील जफारखान नगरवासीयांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने तो मार्गी लावावा, ही मागणी घेऊन पुन्हा महिला-पुरुषांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असूनही कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून यापूर्वी ११ डिसेंबर २०२० रोजी उपोषणाला महिला-पुरुष बसले होते; पण नगर परिषदेने सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात येईल व संबंधित अधिनियमाच्या तरतुदी अन्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे लेखी पत्र दिल्याने उपोषण मागे घेतले होते. पण रस्ता मोकळा केलेला नसल्याने हा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी घेऊन नसरीन असिफ खान, उशारेड्डी दयकलवार, रिजवान अकबर, विठ्ठल कावळे, शिवनंदा स्वामी, मंगल कावळे, सुनीता सुभाष, गोदावरी, पार्वती शंकर, नगमा शे खदिर, शकुंतलाबाई आदींनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २८ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मावळत्या वर्षात सुरू केलेले आमरण उपोषण नवीन वर्षात सुरू आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस असतानाही इकडे कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे व संबंधितांचे साटेलोटे तर नाही ना? उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कोणत्याही अधिका-याने उपोषणस्थळाला भेट दिली नाही. उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असतानाही कोणी लक्ष द्यायला तयार नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. मेलो तरी चालेल, असे उपोषणकर्त्यांनी बोलून दाखविले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ‘प्रशासन आपल्या गावी’ हा उपक्रम राबवून समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. इथे मात्र प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणकर्त्याला बोलायला तयार नाही. याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.