शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

अवघ्या दहा गुंठे जमिनीतून हिरव्या मिरचीचे १ लाखाचे उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 11:32 IST

यशकथा : व्यवहारे यांनी अवघ्या पाच महिन्यांत मिरचीमधून १ लाखांचे उत्पन्न काढले.

- डॉ. गंगाधर तोगरे (कंधार, जि. नांदेड)

कंधार बोरी बु. (ता.कंधार) येथील व्यवहारे कुटुंबाने १० गुंठे साधारण प्रकारच्या जमिनीवर हिरवी मिरची लागवड केली. अपार कष्ट, योग्य नियोजन व देखभाल करीत मारोती खंडू व्यवहारे, पारूबाई मारोती व्यवहारे, उत्तम मारोती व्यवहारे, रमाबाई उत्तम व्यवहारे यांनी अवघ्या पाच महिन्यांत १ लाखांचे उत्पन्न काढले. त्यांचा शेतीतला हा प्रयोग पाहण्यासाठी आता शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. 

कंधार तालुका श्रमिक, जिद्दी म्हणून परिचित आहे. सिंचन प्रमाण अत्यल्प आहे. निसर्ग पावसावर शेतीचे भवितव्य आहे. सिंचनासाठी असलेले प्रकल्प, तलाव पर्जन्यमान घटल्याने तळाला जात आहेत. प्रसंगी कोरडे पडत असल्याने शेतीचे अर्थकारण बिघडत असताना नाउमेद न होता काळ्या आईवर विसंबून राहणारे शेतकरी आपली जिद्द कायम ठेवत आहेत. अशा शेतकऱ्यांत व्यवहारे कुटुंबाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

बारूळ मानार प्रकल्पालगत गाव व शेती असल्याने बोरी बु. गावकऱ्यांना शेती फुलविण्यासाठी लाभ होतो. व्यवहारे कुटुंबाने १० गुंठे साधारण जमिनीवर मिरची लागवडीचा संकल्प केला. त्यासाठी लागवडपूर्व योग्य मशागत केली. सानिया, ज्वाला, ससा या मिरचीची १० हजार रोपे लावली. शेणखत व रासायनिक खतांची योग्य मात्रा दिली. मिरची दिवसागणिक फुलू लागली. सुमारे अडीच फुटापर्यंत रोपट्याची वाढ झाली. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लिंबोळी अर्क व गोमूत्र फवारणी केली.

एका वर्षाचे मिरची पीक असल्याने काळजी अधिक घ्यावी लागते. ती घेताना कोणतीही कसर ठेवली नाही. मिरचीला पाटाद्वारे पाणी देण्याची पद्धत उपयोगात आणली.  लागवड, खत, निंदणी, फवारणी, तोडणी आदीवर सुमारे २० ते २५ हजार खर्च झाला. मिरचीने रोपटे बहरले अन् तोडणी करीत कंधार, मुखेड, लोहा, जळकोट, कुरुळा, नायगाव आदी आठवडी बाजारात मिरची विक्री होऊ लागली. मिरचीला बाजारात आजघडीला भाव बरा आहे. प्रतिकिलो ४० ते ५० भाव असल्याने केलेल्या मेहनतीला फळ येत आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या मिरचीचे पाच महिन्यांत एक लाख उत्पन्न मिळाल्याचे प्रभाकर व्यवहारे यांनी सांगितले.

अद्याप सहा महिन्यांपेक्षा अधिक मिरचीचा हंगाम शिल्लक आहे. त्यामुळे आणखी मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यवहारे  यांनी व्यक्त केली. शेतीत नवनवीन पीक प्रयोग करण्यात ते सतत अग्रेसर असतात. मिरची लागवडीचा प्रयोग करीत त्यांनी यश मिळविल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत कौतुक होत आहे. त्यांनी शेतीत केलेला हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी