शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

राजकारण अन् सामाजिक कार्याची सांगड घालून महिलांनी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:52 IST

स्त्रियांनी स्वत:ला ओळखून कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा़ महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात मिळत असलेल्या संधीचे सोने करावे़ राजकारण चांगले असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून राजकारणाची समाजकार्याशी सांगड घालून कार्य करावे, असे प्रतिपादन शिवधर्म संसदेच्या सदस्या तथा माजी आ़रेखा खेडेकर यांनी केले़

ठळक मुद्देराष्ट्रीय अधिवेशन : माजी आ़रेखा खेडेकर यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्त्रियांनी स्वत:ला ओळखून कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा़ महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात मिळत असलेल्या संधीचे सोने करावे़ राजकारण चांगले असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून राजकारणाची समाजकार्याशी सांगड घालून कार्य करावे, असे प्रतिपादन शिवधर्म संसदेच्या सदस्या तथा माजी आ़रेखा खेडेकर यांनी केले़मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ‘सामाजिक व राजकीय चळवळीतील स्त्रिया अपेक्षा, अनुभव व सकारात्मक सूचना, उपाय’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या़ मंचावर पुष्पा बोंडे, नगरसेविका जयश्री पावडे, प्रगती पाटील, ज्योती पवार आदींची उपस्थिती होती़खेडेकर म्हणाल्या, स्त्रियांनी दैनंदिन घडामोडीवर लक्ष ठेवून काम करणे काळाची गरज असून त्यासाठी वाचन, संवाद वाढविला पाहिजे़ आज राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे़ परंतु, राजकारण चांगले असून त्या माध्यमातून शिक्षण, प्रशासन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते़पुष्पा बोंडे म्हणाल्या, आजच्या स्त्रियांनी जिजाऊ, सावित्रीची प्रेरणा घेवून कार्य केले पाहिजे़ पूर्वीपेक्षा आज वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून त्या ओळखून पुढे येण्याची गरज आहे़ पुढे त्यांनी लंडनमध्ये नोकरी करताना अन् परतल्यानंतर राजकारणात काम करताना आलेल्या कटू-गोड अनुभवाच्या आठवणींचा उलगडा केला़ राजकारणात विचार, आचार, संस्कृती, नैतिक बळ आणि स्वत:च्या नियमाने वागणाºया महिलांना उच्च पदापासून दूर ठेवल्या जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले़ दरम्यान, ज्योती पवार, प्रगती पाटील आदींनी आपले अनुभव व्यक्त केले़ सूत्रसंचालन स्मिता गायकवाड तर सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़ प्रदेशाध्यक्षा डॉ़ रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेखा रावणगावकर, पूनम पारसकर, माधुरी भदाने आदींची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी वनिता देवसरकर, सत्यभामा जाधव, लताताई बारडकर, सारिका कदम, सुनीता शिंदे, राणी दळवी, अंजली मुजळगेकर, सुहासिनी देशमुख, मीनाताई नरवाडे, वर्षा देशमुख, ज्योती जाधव, वैशाली माने, ज्योती डांगे, संगीता चिंचाळकर, अरूणा जाधव, कविता आगलावे, ज्योती पाटील, सावित्रा जाधव, विद्या शिंदे, आशा पाटील, विशाखा ठाकरे आदींनी सहकार्य केले.पदाचा समाजासाठी उपयोग करावा - पावडेनगरसेविका जयश्री पावडे यांनी त्यांच्या पंधरा वर्षांच्या राजकीय वाटचालीतील अनुभव मांडले़ स्वत:ची प्रगती करताना समाजाला वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़ आरक्षणामुळे स्त्रियांना राजकारणात संधी मिळत असून केवळ सह्याजीराव न बनता, स्त्रियांनी आपल्यातील कार्यकुशलता दाखवून त्या पदाचा समाजासाठी उपयोग करावा, असे आवाहन केले़

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडRekhatai Khedekarरेखाताई खेडेकर