शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू आहे. त्याचा सर्वाधिक ताण फ्रंटलाइन वर्करवर पडत आहे. त्यातही पोलीस ...

नांदेड : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाची महामारी सुरू आहे. त्याचा सर्वाधिक ताण फ्रंटलाइन वर्करवर पडत आहे. त्यातही पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचारी तर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे अनेकांना मानसिक आजाराने पछाडले आहे. घरातील लहान मुलांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून ते विलगीकरणात राहत आहेत. हे सर्व उघड्या डोळ्याने त्यांची चिमुकले रोज पाहत आहेत. त्यामुळे यापूर्वी बाबांसारखे पोलीस आणि डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त करणारी चिमुकली आता मात्र नाके मुरडत आहेत. कोरोना असेल तर नको रे बाबा, अशी प्रतिक्रिया या चिमुकल्यांनी दिली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर आणि पोलिसांना आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही. कुठे बाहेर फिरायलाही जाता येत नाही. शाळाही बंदच आहेत. त्यामुळे घरातच कोंडून घेतलेली ही चिमुकली आता कंटाळली आहेत.

गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर आणि पोलीस हे कर्तव्यावर आहेत. आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेकांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. घरातील लहान मुलांच्या मनावर याचा खोलवर परिणाम होत आहे. त्यात शाळा, क्लासेस बंद असल्यामुळे मित्र-मैत्रिणींना भेटून मनावरील ताण हलका होण्यासही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत लहान मुलांचे मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे.

डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ

बाबांसारखे पोलीस व्हायची इच्छा होती; परंतु आता कोरोनामुळे बाबांपासून दूर आहे. गेल्या वर्षभरापासून बाबांसोबत बसून जेवणही करता आले नाही. त्यामुळे कोरोनासारखा आजार नसेल तर पोलीस दलात नोकरी करणे नकोच, असे वाटत आहे.

योगिता कांबळे, पाल्य

बाबा सारखे ड्युटीवरच राहत आहेत. कधी येतात अन् कधी जातात हे कळतच नाही. सारखे चिडचिड करीत राहतात. आईही सांगते पोलिसांना अधिक काम असते म्हणून. त्यामुळे एवढ्या ताणतणावात नोकरी करणे आवडणार नाही.

सुजय टाक, पोलीस पाल्य

बाबांसारखे पोलीस व्हायला आवडेल; पण मोठा अधिकारी झालो पाहिजे. तरच पोलिसांची नोकरी करेल; पण कोरोनासारखी महामारी असेल तर खूप त्रास होतो. बाबांची तब्येतही आता खालावत आहे. त्यामुळे पोलिसाची नोकरी करावी का नाही, असा प्रश्न आहे.

प्रग्यान दळवी, पोलीस पाल्य

गेल्या दीड वर्षापासून बाबा आमच्यापासून वेगळ्या खोलीत राहत आहेत. आम्ही दुरूनच त्यांना पाहत आहोत. जवळ आले तर कोरोना होईल, अशी भीती आहे. त्यामुळे कोरोनासारख्या आजारात डॉक्टरकी नकोच, असे वाटते; पण बाबांकडे पाहून अभिमानही वाटतो.

श्रीजय कुलकर्णी, डॉक्टर पाल्य

कोरोनामुळे बाबा दिवसभर रुग्णालयातच असतात. रात्रीबेरात्री झोपेतून उठून त्यांना जावे लागते. त्यामुळे आमची आणि त्यांची भेटच होत नाही. कोरोना कधी संपेल माहीत नाही; पण या काळात डॉक्टर व्हायला कुणालाच आवडणार नाही.

प्रदीप बोडखे, डॉक्टर पाल्य

कोरोना असो किंवा अन्य कोणतीही महामारी. डॉक्टरांनी रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे कोणत्याही संकटात डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. बाबांसारखीच रुग्णसेवा देण्याचे काम करणार आहे; पण डॉक्टरांचे होणारे मृत्यू पाहून त्रास होतो.

तेजस जोशी, डॉक्टर पाल्य