शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

मरण स्वस्त झाले? नांदेडमध्ये दररोज अपघातात जातोय एकाचा बळी

By प्रसाद आर्वीकर | Updated: October 2, 2022 18:44 IST

घरातून बाहेर पडल्यानंतर घरी सुरक्षित पोहचूत की नाही, अशी परिस्थिती सध्या नांदेड शहरात निर्माण झाली आहे.

नांदेड: घरातून कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणावरून घरी सुरक्षित पोहचूत की नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सरत्या आठवड्यात मनाला वेदना देतील असे पाच अपघात झाले. छोट्या अपघाताची तर गिणतीच नाही. आठ दिवसांत पाच अपघातात ९ जणांचा बळी गेला आहे. सरासरी दररोज एक अपघात बळी जात असल्याने मरण का स्वस्त झाले? असा प्रश्न उपस्थित होतोय. यंत्रणेला दोष द्यायचा की स्वतःला ? यावर आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरत्या आठवड्यात शनिवारची ती रात्र गावाकडे परतणाऱ्या मजुरांसाठी काळरात्र ठरली. हिमायतनगर तालुक्यात कामाच्या शोधात आलेले पश्चिम बंगालचे मजूर ट्रकने गावाकडे परत जात होते. त्याचवेळी समोरुन आलेल्या ट्रकची आणि मजुरांच्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन पाच मजूर ठार झाले. 

याच आठवड्यातील पार्डीचा  अपघात तर अनेकांच्या मनाला चटका लावणारा ठरला. भरधाव वेगातील ट्रकने रस्त्याशेजारच्या घरात घुसून एका युवतीला चिरडले. उच्च शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या वर्षा माणिक मदने हिला कोणताही दोष अथवा चूक नसताना अपघात बळी ठरावे लागले, ही बाब दुर्दैवीच आहे.

या दोन मोठ्या अपघातांसह हदगाव तालुक्यात बस टेम्पोवर धडकून मजुराचा मृत्यू, मुखेड तालुक्यातील जांब येथे बस दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू आणि भोकर तालुक्यात बारडजवळ ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू असे पाच अपघात झाले असून, त्यात ९ जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत.

मागील काही वर्षात रस्ते अपघात वाढले. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रस्ते अपघातांची कारणमीमांसा केली तर अनेक वेगवेगळी कारणे समोर येतील. कोणी खराब रस्त्यांचे कारण पुढे करेल तर कोणी वाहनांच्या अतिवेग, चालकाचा निष्काळजीपणा, यंत्रणेचे दुर्लक्ष, कालबाह्य वाहनांचा वापर, अशी कितीतरी कारणे देऊन वेळ मारून नेली जाईल. पण त्याने गेलेला जीव परत येणार का? याचे उत्तर नकारार्थीच मिळणार. त्यामुळे वाढत्या अपघातांवर सकारात्मक विचार करून यंत्रणा बदलायची की वाहतूक नियम पाळण्यासाठी आपण बदलायचे? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

२३ ते ३० सप्टेंबरमधील अपघातदिनांक           मयत  जखमी२४ सप्टेंबर         ५      ५२६ सप्टेंबर         १      १४२६ सप्टेंबर         १      ०२७ सप्टेंबर         १       ०१९ सप्टेंबर         १       १एकूण                ९      १५

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड