शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील गटबाजी रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST

एकतर्फी कारभाराला विरोध : जिल्हाध्यक्षांना तर ‘व्हाॅईस’च नाही नांदेड : एक खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य ...

एकतर्फी कारभाराला विरोध : जिल्हाध्यक्षांना तर ‘व्हाॅईस’च नाही

नांदेड : एक खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य असे साम्राज्य लाभलेल्या जिल्हा भाजपात नेत्यांमध्येच मोठ्या प्रमाणात गटबाजी पहायला मिळते. पक्षश्रेष्ठींच्या केवळ दौऱ्याच्या वेळी एकत्र दिसणारी ही नेतेमंडळी इतर वेळी मात्र विखुरलेली असते. जिल्हा भाजपात असलेली ही गटबाजी थांबविण्यासाठी श्रेष्ठींकडूनही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाही, हे विशेष. ते पाहता श्रेष्ठींनाही या नेत्यांच्या भांडणातच अधिक रस नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभेचा गड काबीज केला. विधानसभा निवडणुकीतही मुखेड, किनवट, नायगाव हे विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम व आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून भाजपाने राखले. याशिवाय राम पाटील रातोळीकर यांच्या रुपाने एक विधान परिषद सदस्यपदही जिल्हा भाजपाच्या वाट्याला आहे. राजकीय दृष्ट्या हे साम्राज्य बरेच मोठे आहे. त्या बळावर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती काबीज करणे भाजपासाठी कठीण नव्हते. परंतु प्रत्यक्षात तेथे भाजपाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भाजपाची सत्ताही काँग्रेसने हिसकावून घेतली. या अपयशामागे जिल्हा भाजपातील गटबाजी हे प्रमुख कारण सांगितले जाते.

जिल्हा भाजपामध्ये खासदार आणि महानगर प्रमुख हेच काय ते बोलतात, इतरांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे कार्यकर्ते सांगतात. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना तर जणू व्हॉईसच उरलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाकडून आलेला अजेंडा राबवायचा असेल, जिल्हा मुख्यालयी आंदोलन करायचे असेल तर खासदार व महानगर प्रमुखच प्रकर्षाने दिसतात. पक्षाचे आमदार व इतर नेते-पदाधिकाऱ्यांची अप्रत्यक्षरित्या याकडे पाठ असते. अशावेळी ही नेतेमंडळी आपआपल्या कार्यक्षेत्रात आंदोलने करून मतदारसंघ आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतात. यातील कुण्या आमदाराला नागपुरातून तर कुणाला बीडमधून पक्षांतर्गत पाठबळ मिळत असल्याने हे नेते गटबाजी संपवून पक्षवाढीच्या दृष्टीने फारसे गंभीर नाहीत. किनवटच्या आमदाराचे तर महिनोन् महिने नांदेडमध्ये दर्शनही होत नसल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यांचा काँग्रेसला फारसा विरोध न करता अप्रत्यक्षरित्या काँग्रेससोबत आतून जुळवून घेण्याच्या भूमिकेने किनवट मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते कायम संभ्रमात पहायला मिळतात.

आमदार व पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या एककल्ली कारभाराला तीव्र विरोध आहे. या कारभारातूनच जिल्हा भाजपामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या संयुक्त कार्यक्रमाच्या वेळी आणि विशेषत आंदोलनांच्या वेळी ही दुफळी प्रकर्षाने पहायला मिळते. नेत्यांमधील गटबाजीमुळे भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. नेमका कोणत्या नेत्याचा झेंडा हाती धरावा याचा पेच निर्माण झाला आहे. अखेर या गटबाजीला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी घरात बसणे पसंत केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे तिकीट वाटप असो की, जिल्हा व तालुका समित्यांवरील नेमणुका असो, तेथे मर्जीतील कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर मात्र सातत्याने या बाबतीत अन्याय पहायला मिळतो. निष्ठावंतांना डावलून जी-हुजरी करणाऱ्यांनाच लाभाची पदे दिली जातात, अशी ओरड आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाची कोणतीही रणनीती पहायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतरही भाजपाने धडा घेतला नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपातून काही विशेष रणनीती पहायला मिळत नाही. आयता उमेदवार शोधण्याचा प्रयत्न आहे. त्यातही शिवसेनेच्या एका अनुभवी नेत्याला गळाला लावण्याची व्यूहरचना केली जात आहे. पोटनिवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. तेथे फोकस निर्माण करून आंदोलने केली जात आहे. मात्र भाजपाने तेथे आक्रमक आंदोलन उभारण्याचीही तसदी घेतलेली नाही. भाजपातील ही मरगळ व गटबाजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती सोपविण्यास कारणीभूत ठरण्याची हुरहूर भाजपाच्या गोटातून ऐकायला मिळते.

चौकट ........

भाजपाचे नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर

भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांना नुकतेच काँग्रेसच्या एका व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या कार्यक्रमाचे निमित्त कौटुंबिक असले तरी खतगावकर यांनी केलेले भाषण आणि त्यात ‘मी अशोकराव चव्हाणांना खरोखरच घाबरतो’ अशा शब्दात दिलेली कबुली याचीच जिल्ह्याच्या राजकीय गोटात अधिक चर्चा होताना दिसते. कार्यक्रमस्थळीही ‘भास्करराव तुम्ही खरेच बोलला आणि पहिल्यांदाच स्वत:हून कबूल केले हे अधिक चांगले झाले’ असा प्रतिसाद उपस्थितांमधून लगेच ऐकायला मिळाला.