शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 10, 2024 19:04 IST

नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप

नांदेड : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्धद्रूतगती इलेक्ट्रिक मल्टीयुनिट रेल्वेसेवा आहे. ही रेल्वेगाडी सर्व सोयी-सुविधायुक्त असून, प्रवाशांसाठी आरामदायी आहे. वंदे भारत ही जालना ते मुंबई, अशी मागील एक वर्षापासून सुरू करण्यात आली असली, तरी अद्याप नांदेडला सुरू झालेली नाही. त्यामुळे ही गाडी नांदेडपर्यंत कधी धावणार? याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

सध्या नांदेड रेल्वेस्थानकावरून एक्स्प्रेस, पॅसेंजर अशा एकूण ९४ गाड्या धावतात. तर, नांदेड स्थानकावरून १७ रेल्वेगाड्या मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत सुरू आहेत. परंतु, नांदेडहून सर्वात जास्त मुंबई, पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांची गरज आहे. पण, सध्या नांदेड येथून मुंबईसाठी राजाराणी, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन व पनवेल या पाच गाड्या जातात, तर पुण्यासाठी व्हाया औरंगाबाद एक व व्हाया लातूर एक, अशा दोन गाड्या सोडण्यात येतात. परंतु, अनेकदा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेमध्ये आरक्षित जागेवरही प्रवाशांची घुसखोरी होत असते. त्यामुळे आरक्षित सीट केलेल्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत रेल्वेगाडी नांदेडपर्यंत धावल्यास परभणी, नांदेडकरांसाठी सोयीचे होणार आहे. तसेच ९ ते १० तासांच्या आत मुंबईला जाता येईल.

नांदेड-परळ गाडीची मागणीमुंबई स्थानकावर प्लॅटफार्मची कमतरता असल्याने नियमित गाड्यांपेक्षा प्रवाशांची मागणी असूनही अतिरिक्त गाडी सोडली जात नाही. त्यासाठी नांदेडहून परळ गाडीची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या परळ येथील वर्कशॉपच तोडले असून, त्याठिकाणी १० प्लॅटफॉर्मचे रेल्वेस्टेशन उभारले जात आहे. त्यासाठी नांदेडहून मुंबईला जाणा-या प्रवाशासाठी नांदड-परेल गाडी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

आरक्षित डब्यातील घुसखोरी थांबणारयापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट संपल्यानंतर आरएसी आणि त्यानंतर वेटींग तिकीटही मोठ्या प्रमाणात काढण्यात येत होते. परंतु, आता रेल्वे विभागाने आरक्षण काढलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेटींग लिस्ट १ जुलै २०२४ पासून कमी केली आहे. त्याचा परिणाम तिकीट काढल्यानंतर जास्त वेटींग राहत नसल्याने प्रवाशांचे तिकीट वेळीच कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.

म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाहीवंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे जालन्यापर्यंत आलेली वंदे भारत नांदेडपर्यंत कधी धावणार ? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसparabhaniपरभणीrailwayरेल्वे