शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
4
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
5
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
6
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
7
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
8
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
9
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
10
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
11
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
12
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
13
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
14
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
15
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
16
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
17
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
18
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
19
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
20
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 10, 2024 19:04 IST

नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप

नांदेड : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्धद्रूतगती इलेक्ट्रिक मल्टीयुनिट रेल्वेसेवा आहे. ही रेल्वेगाडी सर्व सोयी-सुविधायुक्त असून, प्रवाशांसाठी आरामदायी आहे. वंदे भारत ही जालना ते मुंबई, अशी मागील एक वर्षापासून सुरू करण्यात आली असली, तरी अद्याप नांदेडला सुरू झालेली नाही. त्यामुळे ही गाडी नांदेडपर्यंत कधी धावणार? याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

सध्या नांदेड रेल्वेस्थानकावरून एक्स्प्रेस, पॅसेंजर अशा एकूण ९४ गाड्या धावतात. तर, नांदेड स्थानकावरून १७ रेल्वेगाड्या मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत सुरू आहेत. परंतु, नांदेडहून सर्वात जास्त मुंबई, पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांची गरज आहे. पण, सध्या नांदेड येथून मुंबईसाठी राजाराणी, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन व पनवेल या पाच गाड्या जातात, तर पुण्यासाठी व्हाया औरंगाबाद एक व व्हाया लातूर एक, अशा दोन गाड्या सोडण्यात येतात. परंतु, अनेकदा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेमध्ये आरक्षित जागेवरही प्रवाशांची घुसखोरी होत असते. त्यामुळे आरक्षित सीट केलेल्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत रेल्वेगाडी नांदेडपर्यंत धावल्यास परभणी, नांदेडकरांसाठी सोयीचे होणार आहे. तसेच ९ ते १० तासांच्या आत मुंबईला जाता येईल.

नांदेड-परळ गाडीची मागणीमुंबई स्थानकावर प्लॅटफार्मची कमतरता असल्याने नियमित गाड्यांपेक्षा प्रवाशांची मागणी असूनही अतिरिक्त गाडी सोडली जात नाही. त्यासाठी नांदेडहून परळ गाडीची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या परळ येथील वर्कशॉपच तोडले असून, त्याठिकाणी १० प्लॅटफॉर्मचे रेल्वेस्टेशन उभारले जात आहे. त्यासाठी नांदेडहून मुंबईला जाणा-या प्रवाशासाठी नांदड-परेल गाडी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

आरक्षित डब्यातील घुसखोरी थांबणारयापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट संपल्यानंतर आरएसी आणि त्यानंतर वेटींग तिकीटही मोठ्या प्रमाणात काढण्यात येत होते. परंतु, आता रेल्वे विभागाने आरक्षण काढलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेटींग लिस्ट १ जुलै २०२४ पासून कमी केली आहे. त्याचा परिणाम तिकीट काढल्यानंतर जास्त वेटींग राहत नसल्याने प्रवाशांचे तिकीट वेळीच कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.

म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाहीवंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे जालन्यापर्यंत आलेली वंदे भारत नांदेडपर्यंत कधी धावणार ? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसparabhaniपरभणीrailwayरेल्वे