शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

द्वेषभावनेचा त्याग केला तर मैत्रीभावना वाढीस लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:20 IST

खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने निघालेल्या भिक्खूंच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे लोहा तालुक्यातील कोल्हे बोरगाव, ...

खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने निघालेल्या भिक्खूंच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे लोहा तालुक्यातील कोल्हे बोरगाव, जवळा देशमुख, खडकमांजरी या ठिकाणी आगमन झाले. खडकमांजरी येथे झालेल्या कार्यक्रमात पंय्याबोधी बोलत होते. ते म्हणाले की, मानवाला अनेक प्रकारची आसक्ती असते. त्यामुळे दुःखनिर्मिती होते. दु:खमुक्तीसाठी आसक्तीचा त्याग केला पाहिजे. तृष्णेवर मात करणे हेच बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे. यावेळी भंते संघरत्न यांचीही धम्मदेसना पार पडली.

धम्ममित्र अनुरत्न वाघमारे व गंगाधर ढवळे यांनी याचना केल्यानंतर पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थित उपासक - उपासिकांना त्रिसरण पंचशिल दिले. त्यानंतर धम्मदेसना झाली. यावेळी भंते संघरत्न, भंते धम्मकीर्ती, भंते श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सदानंद यांच्यासह नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ, अनुरत्न वाघमारे, धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, सरपंच चांदोजी कापसे, उपसरपंच गणपत वाघमारे, ग्रा.पं. सदस्य आनंदराव एडके, सुकेशिनी वाघमारे, पोलीस पाटील गौतम वाघमारे, चांदू एडके, विश्वनाथ कांबळे, धम्मचळवळीचे देविदास एडके, श्यामसुंदर वाघमारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन देविदास एडके यांनी केले. आभार आत्माराम गायकवाड यांनी मानले. यावेळी आर्थिक दान व सर्व प्रकारच्या धान्याचे दान करून उपासकांनी दान पारमिता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोती वाघमारे, संतोष वाघमारे, दशरथ एडके, परमेश्वर वाघमारे, मारोतराव जोंधळे, गंगाधर जोंधळे, भीमराव वाघमारे, हरी एडके, लिंबाजी गायकवाड, किशन वाघमारे, नारायण वाघमारे, किशन मेकाले, मारोती हंकारे, निवृत्ती वाघमारे यांच्यासह तथागत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.