शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल : डॉ. प्रतिभा अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य ...

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, अशोक खनाडे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, भय्यासाहेब गोडबोले, साऊल झोटे, सज्जन बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रतिभा म्हणाल्या, इथल्या आंबेडकरी चळवळींना निष्प्रभ करण्याचे कारस्थानी काम सातत्याने सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, नेते आणि बुद्धिजिवींची बुद्धीच भ्रमिष्ट करण्याचा आराखडा आखला गेला आहे. सामाजिक आणि मानसिक गुलामीतच संपूर्ण भारतीय समाज कसा राहील यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. क्रांतीचा रथ जोमाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते स्वार्थांध झाले आहेत. बाबासाहेबांनी फिरविलेले क्रांतीचे चक्र उलट्या दिशेने फिरत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आज, शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रख्यात विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.

चौकट...

चळवळीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा

बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रिया अग्रभागी होत्या. समतेच्या आणि समानतेच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना सर्वच बाबतीत बरोबरीने ठेवायला हवे होते; पण तसे झाले नाही. आंबेडकरी समाजातही आजच्या परिस्थितीत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचे आणि तिच्यावर अधिक अन्याय करण्याचे प्रकार सुरू आहेत. धम्मक्रांतीनंतरच्या इतक्या कालखंडानंतर आपण स्त्रीला समानतेची वागणूक देऊ शकलो नाही. तिच्याबाबातचा दृष्टिकोन बदलू शकलो नाही. स्त्रियांना माणूसपण बहाल केल्याशिवाय सर्वांगीण प्रगती होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.