शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

सामाजिक एकतेच्या बळानेच क्रांतीचे चक्र फिरेल : डॉ. प्रतिभा अहिरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:16 IST

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य ...

त्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी 'क्रांतीचे चक्र पूर्ण कधी फिरेल?' या विषयावर बोलत होत्या. यावेळी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बनसोड, अशोक खनाडे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, भय्यासाहेब गोडबोले, साऊल झोटे, सज्जन बरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रतिभा म्हणाल्या, इथल्या आंबेडकरी चळवळींना निष्प्रभ करण्याचे कारस्थानी काम सातत्याने सुरू आहे. चळवळीतील कार्यकर्ते, नेते आणि बुद्धिजिवींची बुद्धीच भ्रमिष्ट करण्याचा आराखडा आखला गेला आहे. सामाजिक आणि मानसिक गुलामीतच संपूर्ण भारतीय समाज कसा राहील यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतले आहेत. क्रांतीचा रथ जोमाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, ते स्वार्थांध झाले आहेत. बाबासाहेबांनी फिरविलेले क्रांतीचे चक्र उलट्या दिशेने फिरत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आज, शुक्रवारी सायंकाळी सात वाजता प्रख्यात विचारवंत डॉ. यशवंत मनोहर हे व्याख्यानमालेचा समारोप करणार आहेत.

चौकट...

चळवळीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा

बाबासाहेबांच्या चळवळीत स्त्रिया अग्रभागी होत्या. समतेच्या आणि समानतेच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना सर्वच बाबतीत बरोबरीने ठेवायला हवे होते; पण तसे झाले नाही. आंबेडकरी समाजातही आजच्या परिस्थितीत स्त्रियांना दुय्यम लेखण्याचे आणि तिच्यावर अधिक अन्याय करण्याचे प्रकार सुरू आहेत. धम्मक्रांतीनंतरच्या इतक्या कालखंडानंतर आपण स्त्रीला समानतेची वागणूक देऊ शकलो नाही. तिच्याबाबातचा दृष्टिकोन बदलू शकलो नाही. स्त्रियांना माणूसपण बहाल केल्याशिवाय सर्वांगीण प्रगती होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.