शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय, शासन विचारात, विद्यार्थी संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यासोबतच इतर कोणते उपाय उपलब्ध आहेत, याची माहिती शिक्षणतज्ज्ञांकडून घेतली जात आहे. राज्य ...

कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घेण्यासोबतच इतर कोणते उपाय उपलब्ध आहेत, याची माहिती शिक्षणतज्ज्ञांकडून घेतली जात आहे. राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थीही आता परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार नाहीत. त्यातच कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केल्यास अशा परिस्थितीत परीक्षा कशा देणार, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर निर्माण झाला आहे. तसेच बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांची परीक्षेला सामोरे जाण्याची तयारीही राहिली नाही.

चौकट-

काय असू शकतो पर्याय

१. शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केल्यापासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेले आहेत, तर दुसरीकडे बारावीचे विद्यार्थी परीक्षा होणार की नाही, या संभ्रमात आहेत. त्यातच आता कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल भाकीत करण्यात येत आहे. अशा वेळी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात शासनाने ऑनलाइन परीक्षेचे धोरण राबवावे, असे वाटते. - शिवा कांबळे, शिक्षणतज्ज्ञ

२. बारावी बाेर्ड परीक्षा असल्यामुळे ती व्हायलाच हवी. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित अशा प्रकारची परीक्षा घेता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाची योग्य वेळेत मांडणी करून त्यावर यश मिळविले पाहिजे. बारावी बाेर्ड परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या उच्च शिक्षणाची दिशा समजेल. अशा संकटकाळात वैद्यकीय पात्रता पूर्वपरीक्षा यशस्वीपणे पार पडली. त्याच पद्धतीने बारावी बोर्ड परीक्षा व्हावी. - प्रा. धाराशिव व्ही. शिराळे, शिक्षणतज्ज्ञ

३. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा अविभाज्य भाग आहे. दहावीच्या परीक्षेचे पूर्वनियोजन केलेले असते तर दहावीची परीक्षासुद्धा घेता आली असती. मात्र आता बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना कोणतीही बाधा होऊ नये, यासाठी ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करावे, शासनाने कोणताही निर्णय लवकर घ्यावा, ज्यामुळे विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था कमी होईल. - बालासाहेब कच्छवे, शिक्षणतज्ज्ञ

चौकट-विद्यार्थी संभ्रमात

१. मागील वर्षभरापासून बारावीच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत संभ्रम होता. ऑनलाइन शिक्षणामुळे बारावीच्या अभ्यासक्रमाची ओळखच झाली नाही. त्यात कशी तरी तयारी केली होती. मात्र आता परीक्षा कधी होणार, होणार की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. - रक्षा इंगळे, विद्यार्थिनी

२. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखविण्यात येत आहे. त्यातच आता परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास परीक्षा मनमोकळ्या मन:स्थितीत देता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित राहतील, यादृष्टीने निर्णय घेतला जावा. - दिव्या दाढेल, विद्यार्थिनी

३. शासनाने कोणताही निर्णय घ्यावा, पण तो लवकर घ्यावा, मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेले आहेत. आता परीक्षा घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ दिला पाहिजे. - आकाश कवडे, विद्यार्थी