शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 22, 2024 19:16 IST

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही.

नांदेड : मागील वर्षी पावसाचा ताण पडल्याने नांदेडसहपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईची आतापासूनच चिंता लागली असून, पाणीपुवठा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे शहरी भागात नागरिकांना पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या डोक्यावर हंडा आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून, दररोज पाणीसाठा कमी होत चालला आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याने भूजल पातळीवरही परिणाम होत आहे. खासगी बोअर, विहिरींची पातळी कमी होत आहे. तसेच अनेक जलस्रोतांचे पाणीही आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.

नांदेड पाटबंधारे मंडळाडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या ३८ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यात ४२ टक्के तर परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यातील आणखी दोन महिने शिल्लक असून, प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईची धास्ती आतापासूनच घ्यावी लागणार आहे.

परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्केपरभणी जिल्ह्यात उच्च पातळी बंधारे, लघू प्रकल्प आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात मिळून १०९ दलघमी पाणी साठवण करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १६.४० दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी १५ टक्के एवढी आहे.

नांदेडमध्ये ३८ टक्के तर हिंगोलीत ४२ टक्के साठानांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, त्यामध्ये नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ४८ टक्के, मानार प्रकल्पात ३४ टक्के, मध्यम प्रकल्पांत ३१ टक्के, उच्च पातळी बंधाऱ्यात ४१ टक्के पाणीसाठा आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये येलदरी प्रकल्पात ४० टक्के, सिद्धेश्वर ६१ टक्के, लघू प्रकल्पात २३ टक्के, आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात ४० टक्के साठा आहे.

ग्रामीण भागालाच टंचाईच्या झळाउन्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन दरवर्षी केले जाते. त्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी केली जाते. मात्र त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही तपशील आराखड्यात नमूद केला जातो. मात्र उपाययोजना सुरू होईपर्यंत ग्रामस्थांना टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात. याउलट शहरासाठी मात्र जून महिन्यापर्यंत लागणारे पाणी राखीव ठेवले जाते. त्यामुळे शहरात तेवढी टंचाई जाणवत नाही. पण, ग्रामीण भागाला झळा सहन कराव्या लागतात.

प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारी)जिल्हा यावर्षी मागील वर्षीनांदेड ३७.८३ ४८.२५हिंगोली ४१.४९ ६७.९९परभणी १४.९६ ४५.१४

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीNandedनांदेडHingoliहिंगोली