शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 22, 2024 19:16 IST

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही.

नांदेड : मागील वर्षी पावसाचा ताण पडल्याने नांदेडसहपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईची आतापासूनच चिंता लागली असून, पाणीपुवठा करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे शहरी भागात नागरिकांना पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या डोक्यावर हंडा आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून, दररोज पाणीसाठा कमी होत चालला आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी झाल्याने भूजल पातळीवरही परिणाम होत आहे. खासगी बोअर, विहिरींची पातळी कमी होत आहे. तसेच अनेक जलस्रोतांचे पाणीही आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत.

नांदेड पाटबंधारे मंडळाडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या ३८ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यात ४२ टक्के तर परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यातील आणखी दोन महिने शिल्लक असून, प्रकल्पातील पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईची धास्ती आतापासूनच घ्यावी लागणार आहे.

परभणी जिल्ह्यात केवळ १५ टक्केपरभणी जिल्ह्यात उच्च पातळी बंधारे, लघू प्रकल्प आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात मिळून १०९ दलघमी पाणी साठवण करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ १६.४० दलघमी साठा असून, त्याची टक्केवारी १५ टक्के एवढी आहे.

नांदेडमध्ये ३८ टक्के तर हिंगोलीत ४२ टक्के साठानांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, त्यामध्ये नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ४८ टक्के, मानार प्रकल्पात ३४ टक्के, मध्यम प्रकल्पांत ३१ टक्के, उच्च पातळी बंधाऱ्यात ४१ टक्के पाणीसाठा आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये येलदरी प्रकल्पात ४० टक्के, सिद्धेश्वर ६१ टक्के, लघू प्रकल्पात २३ टक्के, आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात ४० टक्के साठा आहे.

ग्रामीण भागालाच टंचाईच्या झळाउन्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन दरवर्षी केले जाते. त्यात पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांची यादी केली जाते. मात्र त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचाही तपशील आराखड्यात नमूद केला जातो. मात्र उपाययोजना सुरू होईपर्यंत ग्रामस्थांना टंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात. याउलट शहरासाठी मात्र जून महिन्यापर्यंत लागणारे पाणी राखीव ठेवले जाते. त्यामुळे शहरात तेवढी टंचाई जाणवत नाही. पण, ग्रामीण भागाला झळा सहन कराव्या लागतात.

प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा (टक्केवारी)जिल्हा यावर्षी मागील वर्षीनांदेड ३७.८३ ४८.२५हिंगोली ४१.४९ ६७.९९परभणी १४.९६ ४५.१४

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीNandedनांदेडHingoliहिंगोली