शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बाभळी बंधाऱ्यातून सोडले तेलंगणाला पाणी; पाणी पातळी आली ३३३ मीटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:26 IST

या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

ठळक मुद्देबाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडले बंधाऱ्यात आता ०.७१ पाणीसाठा शिल्लक

धर्माबाद (जि. नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ अकरा वाजता उघडले व तेलंगणातपाणी सोडल्यानंतर दुपारी १ वाजता दरवाजे बंद करण्यात आले. ०.६  टीएमसी पाणीतेलंगणात सोडण्यात आल्याने आता बंधाऱ्यात ०.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध.) गावातील गोदावरी नदीकाठावर २५० कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधारा बांधला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पार पडला. त्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला. या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी याबाबत निर्णय दिला असून बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ आॅक्टोबरनंतर खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरच्या बॅकवॉटर साठ्यात १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निकाल दिला. त्यानुसार १ मार्च रोजी नांदेड पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या चार दरवाजांतून उपलब्ध १.३१ टीएमसी साठ्यातून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.

पाणीपातळी ३३३ मीटरवरपाणी सोडण्यापूर्वी पाणीपातळी ३३५ मीटर होती. पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी ३३३ मीटरवर आली असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पडवळकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे सहसचिव जी.पी. मिसाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणीTelanganaतेलंगणाNandedनांदेड