शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बाभळी बंधाऱ्यातून सोडले तेलंगणाला पाणी; पाणी पातळी आली ३३३ मीटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:26 IST

या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

ठळक मुद्देबाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडले बंधाऱ्यात आता ०.७१ पाणीसाठा शिल्लक

धर्माबाद (जि. नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ अकरा वाजता उघडले व तेलंगणातपाणी सोडल्यानंतर दुपारी १ वाजता दरवाजे बंद करण्यात आले. ०.६  टीएमसी पाणीतेलंगणात सोडण्यात आल्याने आता बंधाऱ्यात ०.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध.) गावातील गोदावरी नदीकाठावर २५० कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधारा बांधला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पार पडला. त्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला. या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी याबाबत निर्णय दिला असून बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ आॅक्टोबरनंतर खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरच्या बॅकवॉटर साठ्यात १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निकाल दिला. त्यानुसार १ मार्च रोजी नांदेड पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या चार दरवाजांतून उपलब्ध १.३१ टीएमसी साठ्यातून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.

पाणीपातळी ३३३ मीटरवरपाणी सोडण्यापूर्वी पाणीपातळी ३३५ मीटर होती. पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी ३३३ मीटरवर आली असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पडवळकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे सहसचिव जी.पी. मिसाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणीTelanganaतेलंगणाNandedनांदेड