शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

बाभळी बंधाऱ्यातून सोडले तेलंगणाला पाणी; पाणी पातळी आली ३३३ मीटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:26 IST

या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

ठळक मुद्देबाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे उघडले बंधाऱ्यात आता ०.७१ पाणीसाठा शिल्लक

धर्माबाद (जि. नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बाभळी बंधाऱ्याचे चार दरवाजे १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत सकाळी ११ अकरा वाजता उघडले व तेलंगणातपाणी सोडल्यानंतर दुपारी १ वाजता दरवाजे बंद करण्यात आले. ०.६  टीएमसी पाणीतेलंगणात सोडण्यात आल्याने आता बंधाऱ्यात ०.७१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

धर्माबाद तालुक्यातील बाभळी (ध.) गावातील गोदावरी नदीकाठावर २५० कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने बाभळी बंधारा बांधला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पार पडला. त्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला. या बंधाऱ्याच्या बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. 

यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी याबाबत निर्णय दिला असून बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ आॅक्टोबरनंतर खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत. पूर्वीचे आंध्रप्रदेश व आताच्या तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरच्या बॅकवॉटर साठ्यात १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निकाल दिला. त्यानुसार १ मार्च रोजी नांदेड पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या चार दरवाजांतून उपलब्ध १.३१ टीएमसी साठ्यातून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.

पाणीपातळी ३३३ मीटरवरपाणी सोडण्यापूर्वी पाणीपातळी ३३५ मीटर होती. पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी ३३३ मीटरवर आली असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी केंद्रीय जलआयोगाचे कार्यकारी अभियंता व्ही. गंगाधर, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता बी. रामाराव, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पडवळकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर.के. मुक्कावार, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, तसेच बाभळी बंधारा कृती समितीचे सहसचिव जी.पी. मिसाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :DamधरणWaterपाणीTelanganaतेलंगणाNandedनांदेड