शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Maharashtra election 2019 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:47 IST

अशोक चव्हाण भोकरमधून रिंगणात । वसंतराव चव्हाण, डी. पी. सावंत सलग तिसऱ्यावेळी, तर प्रदीप नाईक चौथ्यांदा मैदानात

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोरांमुळे चुरस वाढली आहे. शिवसेना-भाजपचा राष्टÑीयस्तरावरील मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी मतदारसंघातील स्थानिक मुद्यांमुळेच निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेस सरसावल्याचे चित्र असून, भाजपा आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांनी शहर महानगराध्यक्षपदाचा राजीनामा देत बंडखोरी केल्याने येथे आता चौरंगी सामना रंगला आहे. हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील येथून मैदानात असल्याने सेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातही चौरंगी सामना होत असला तरी येथे काँग्रेसचे डी. पी. सावंत यांच्यासमोर शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी आव्हान उभे केले आहे. येथे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. किनवटमध्ये प्रदीप नाईक यांच्यासमोर भाजपाने ऐनवेळी भीमराव केराम यांना उमेदवारी दिली. येथे भाजपाचे नाराज झालेले इच्छुक केराम यांना कितपत मदत करतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.काय आहे उर्ध्व पैनगंगा पाणीप्रश्नउर्ध्व पैनगंगा प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती़ परंतु, मागील काही वर्षात त्यात घट होत आज ८० ते ९० हजार हेक्टरलाच पाणी मिळत आहे़ त्यातच यंदा नांदेडकडे येणारे पाणी पुसद आणि हिंगोलीकडे पळविण्यात आले़यासंदर्भात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून प्रचारादरम्यान केला जात आहे़ या प्रकारामुळे अर्धापूर, उमरी, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यातील जवळपास १५ जे २० हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता असून याप्रकरणी माधवराव कदम, भगवानराव तिडके यांनी जलप्राधिकरणाकडे धाव घेतली आहे़नांदेडचे पाणी पळविण्यामागे भाजप सरकारचा हात असल्याचे सांगत यामुळे भविष्यात नांदेड जिल्ह्याचे वाळवंट होईल, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून केला जात आहे़

रंगतदार लढतीसर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरल्याने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. येथे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यासमोर भाजपाच्या दिलीप कंदकुर्ते यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. काँग्रेसकडून मोहन हंबर्डे तर वंचित आघाडीकडून फारुख अहमद रिंगणात आहेत.नायगाव मतदारसंघातही चुरशीचा तिरंगी सामना होत आहे. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण अणि भाजपाचे राजेश पवार यांनी प्रचारात जोर लावला आहे. येथे वंचित आघाडीचे मारोतराव कवळे गुरुजी यांची मते निर्णायक ठरतील.हदगाव मतदारसंघात शिवसेनेचे नागेश पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने माधवराव पवार यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांच्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.भोकरमध्ये भाजपचाआयात उमेदवारभोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपचे बापूसाहेब गोरठेकर आहेत. राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या गोरठेकरांना आयात करीत भाजपने उमेदवारी बहाल केली. येथे प्रचारात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटलेला आहे. नायगावमध्ये वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून तिसºयावेळी रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राजेश पवार हे भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत देत आहेत.मात्र वंचित बहुजन आघाडीने मारोतराव कवळे यांना रिंगणात उतरविल्याने तिरंगी सामना होत आहे.हदगाव मतदारसंघातयंदा चुरशीची तिरंगी लढतहदगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासमोर माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे येथेही चुरशीची तिरंगी लढत होत आहे. देगलूरमध्ये शिवसेनेचे सुभाष साबणे आणि काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर तर मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड व काँग्रेसचे भाऊसाहेब मंडलापुरकर यांच्यात सामना होत आहे. लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांना भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकरांचे पाठबळ असल्याने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.