शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Maharashtra election 2019 : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 06:47 IST

अशोक चव्हाण भोकरमधून रिंगणात । वसंतराव चव्हाण, डी. पी. सावंत सलग तिसऱ्यावेळी, तर प्रदीप नाईक चौथ्यांदा मैदानात

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि बंडखोरांमुळे चुरस वाढली आहे. शिवसेना-भाजपचा राष्टÑीयस्तरावरील मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी मतदारसंघातील स्थानिक मुद्यांमुळेच निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेस सरसावल्याचे चित्र असून, भाजपा आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

नांदेड दक्षिण मतदारसंघात भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांनी शहर महानगराध्यक्षपदाचा राजीनामा देत बंडखोरी केल्याने येथे आता चौरंगी सामना रंगला आहे. हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील येथून मैदानात असल्याने सेनेने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. नांदेड उत्तर मतदारसंघातही चौरंगी सामना होत असला तरी येथे काँग्रेसचे डी. पी. सावंत यांच्यासमोर शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी आव्हान उभे केले आहे. येथे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली आहे. किनवटमध्ये प्रदीप नाईक यांच्यासमोर भाजपाने ऐनवेळी भीमराव केराम यांना उमेदवारी दिली. येथे भाजपाचे नाराज झालेले इच्छुक केराम यांना कितपत मदत करतात, यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.काय आहे उर्ध्व पैनगंगा पाणीप्रश्नउर्ध्व पैनगंगा प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील जवळपास १ लाख ५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती़ परंतु, मागील काही वर्षात त्यात घट होत आज ८० ते ९० हजार हेक्टरलाच पाणी मिळत आहे़ त्यातच यंदा नांदेडकडे येणारे पाणी पुसद आणि हिंगोलीकडे पळविण्यात आले़यासंदर्भात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून प्रचारादरम्यान केला जात आहे़ या प्रकारामुळे अर्धापूर, उमरी, धर्माबाद, भोकर, मुदखेड तालुक्यातील जवळपास १५ जे २० हजार हेक्टरला फटका बसण्याची शक्यता असून याप्रकरणी माधवराव कदम, भगवानराव तिडके यांनी जलप्राधिकरणाकडे धाव घेतली आहे़नांदेडचे पाणी पळविण्यामागे भाजप सरकारचा हात असल्याचे सांगत यामुळे भविष्यात नांदेड जिल्ह्याचे वाळवंट होईल, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून केला जात आहे़

रंगतदार लढतीसर्वाधिक ३८ उमेदवार रिंगणात उतरल्याने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. येथे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांच्यासमोर भाजपाच्या दिलीप कंदकुर्ते यांनी बंडाचा झेंडा फडकाविला आहे. काँग्रेसकडून मोहन हंबर्डे तर वंचित आघाडीकडून फारुख अहमद रिंगणात आहेत.नायगाव मतदारसंघातही चुरशीचा तिरंगी सामना होत आहे. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण अणि भाजपाचे राजेश पवार यांनी प्रचारात जोर लावला आहे. येथे वंचित आघाडीचे मारोतराव कवळे गुरुजी यांची मते निर्णायक ठरतील.हदगाव मतदारसंघात शिवसेनेचे नागेश पाटील यांच्या विरोधात काँग्रेसने माधवराव पवार यांना रिंगणात उतरविले आहे. मात्र सेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांच्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.भोकरमध्ये भाजपचाआयात उमेदवारभोकर मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपचे बापूसाहेब गोरठेकर आहेत. राष्टÑवादीचे माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या गोरठेकरांना आयात करीत भाजपने उमेदवारी बहाल केली. येथे प्रचारात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा मुद्दा पेटलेला आहे. नायगावमध्ये वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून तिसºयावेळी रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर राजेश पवार हे भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी लढत देत आहेत.मात्र वंचित बहुजन आघाडीने मारोतराव कवळे यांना रिंगणात उतरविल्याने तिरंगी सामना होत आहे.हदगाव मतदारसंघातयंदा चुरशीची तिरंगी लढतहदगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासमोर माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे येथेही चुरशीची तिरंगी लढत होत आहे. देगलूरमध्ये शिवसेनेचे सुभाष साबणे आणि काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर तर मुखेडमध्ये भाजपचे तुषार राठोड व काँग्रेसचे भाऊसाहेब मंडलापुरकर यांच्यात सामना होत आहे. लोहा मतदारसंघात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांना भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकरांचे पाठबळ असल्याने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.