शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

विष्णूपुरीसह उर्ध्व पैनगंगा, निम्न मानारमधून सिंचनासाठी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष ...

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून रब्बी हंगामासाठी तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत. त्यातील दोन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या असून, ७ फेब्रुवारीला तिसरी पाणी पाळी सिंचनासाठी दिली जाणार आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह निम्न मानार प्रकल्पातूनही रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या सोडल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के (८०.७९ दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून, त्यातून २१.० दशलक्ष घनमीटर व दिग्रस बंधाऱ्यातून २४.० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. याद्वारे एकूण १२५.९५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन १६.३२ दशलक्ष घनमीटर वजा करता १०९.६३ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी ३८.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१.०८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, सुमारे १३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातूनही उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. आणखी एक पाणी पाळी २७ जानेवारी रोजी दिली जाईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी ९६४.१० दशलक्ष घनमीटर (१०० टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन १७६.३२ दशलक्ष घनमीटर वजा जाता ७८७.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ७७.१५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१०.६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून ८६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात ३ पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात ४ पाणी पाळ्यांचे नियोजन केले आहे. त्यातील २७ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३१ डिसेंबरची पाणी पाळी पूर्ण झाली आहे. २७ जानेवारी २०२१, १ मार्च २०२१, २७ मार्च २०२१, २३ एप्रिल २०२१, १९ मे २०२१ रोजी पाणी सोडले जाईल.

निम्न मानार प्रकल्पात तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच १०० टक्के (१२३.४९ दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ २४.८८ दशलक्ष घनमीटर वजा करता ९८.६१ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी ४.६१ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ९४.०० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून सुमारे २३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. २५ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३० डिसेंबर, २४ जानेवारी रोजी पाणी पाळी देण्यात आली आहे. आता १ मार्च २०२१, १ एप्रिल २०२१, १ मे २०२१ या तारखांमध्ये केवळ आपत्कालीन परिस्थितीतच बदल होऊ शकतो.