शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

जलयुक्तसाठी जिल्ह्याला सव्वाचार कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:31 AM

शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील अनेक कामे निधीअभावी रखडली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील बहुतांश कामांचा समावेश असून सदर कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने नांदेड जिल्ह्याला ४.२४ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात जलसंधारण मंत्रालयाने १६ मार्च रोजी शासन अध्यादेश काढला आहे.जिल्ह्यात २०१५ पासून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मागील तीन वर्षांत या योजनेतून झालेल्या कामांमुळे पाणीपातळीत वाढ झाली असून वैयक्तिक शेततळी, पाझर तलाव आदींकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.यासाठी गावकºयांचा सामूहिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावातील कामे झपाट्याने झाली. दरम्यान, काही दिवसांपासून निधीअभावी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरु केलेली कामे रखडली होती.आता ही कामे करण्यासाठी शासनाने २०१७-१८ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी ४.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी वित्त विभागाने जिल्हाधिकारी यांना वितरित केला आहे. ४.२४ कोटींपैकी २.०७ कोटी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेसाठी तर २.१७ कोटी रुपये जलयुक्त शिवार अभियानाकरिता देण्यात आले आहेत.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत नियोजित केलेली कामे करुन उरलेला निधी जलयुक्त शिवारसाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या गावांतील कामांसाठी हा निधी वापरला जाईल. या योजनेतील कामांसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त तर जिल्हाधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.दरम्यान, निवड झालेल्या गावांतील नदी खोलीकरण, तलाव आदी कामे पावसाळा सुरु होण्याअगोदर पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.