शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:32 IST

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या ...

ठळक मुद्देनियमांचा कचाटा : जिल्ह्यात ७८७ कोटींची माफी

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या कचाट्यात आजही लाखो शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ३१ हजार १०५ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे़उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर तेथील मुख्यमंत्री योगी यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. उत्तर प्रदेशात कर्जमाफी करता येते; मग महाराष्ट्रात का नाही, या मुद्यावर विरोधकांसह विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला़ नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना सदर कर्जमाफीचा फायदा होईल, असे बोलले जात होते़ परंतु, १ लाख ७६ हजार ५० शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरले़ त्यातही आजपर्यंत प्रत्यक्ष १ लाख ४४ हजार ९४५ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ या सर्व शेतकºयांच्या बँक खात्यात ७८७ कोटी ९८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत़नांदेड जिल्ह्यातील शेतकºयांवर खासगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज होते़ त्यापैकी ७८७ कोटी रूपये आजपर्यंत बँकांच्या खात्यात वर्ग झाले आहेत़ नांदेड जिल्ह्यासाठी १ हजार २३ कोटी ८९ लाख रूपये मिळाले होते़ त्यापैकी २३५ कोटी रूपये आजही बँकांच्या खात्यात पडून आहेत़राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीत दीड लाख रूपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ केले़ तर दीड लाखाहून अधिक कर्ज असणाºया शेतकºयांसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली होती़ परंतु, या योजनेकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळेच ३१ हजार १०५ शेतकरी पात्र असूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जावू शकत नाही़ एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरल्यास २३५ कोटी ९६ लाख रूपयांचा लाभ मिळू शकेल़

  • नांदेड जिल्ह्यात स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेकडून सर्वाधिक ७६ हजार ८८० शेतक-यांना ५३० कोटी ७७ लाख रूपये कर्जमाफी देण्यात आली आहे़ तर बँक आॅफ महाराष्ट्रामधून ६ हजार ५१४ शेतक-यांना ३० कोटी ७६ लाख रूपये, डीसीसीबी बँकेतून ३९ हजार ४०७ शेतकºयांना ५३ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली़

खावटी कर्ज माफ करण्याचा सरकारचा निर्णयछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना लाभ मिळणार आहे़ सरकारकडून कर्जमाफी संदर्भात वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत़ त्यामुळे येणाºया काळात सरसकट कर्जमाफी केली जाईल, या आशेने दीड लाखावरील कर्ज भरण्यास कोणीही शेतकरी धजावत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी