शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
5
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
6
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
7
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
8
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
9
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
10
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
11
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
12
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
13
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
14
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
15
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
16
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
17
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
18
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
19
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
20
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या

बिलोली तालुक्यात वाळूघाटांच्या गावांत वाढले मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 20:21 IST

सीमावर्ती असलेल्या गावांतील नागरिकांना  वाळूठेक्यातून बोनस मिळत असल्याने स्थलांतरित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परत येत आहेत़ त्यामुळे मतदार यादीत झपाट्याने  वाढ होत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देबिलोली तालुका मांजरा नदीतील लाल वाळूसाठी प्रसिद्ध आहे.तेलंगणा सीमावर्ती असलेल्या मांजरा नदीपात्रात वेगवेगळ्या गावांत दहा शासकीय वाळूघाट आहेत.

बिलोली ( नांदेड ): तालुक्यात सीमावर्ती असलेल्या गावांतील नागरिकांना  वाळूठेक्यातून बोनस मिळत असल्याने स्थलांतरित झालेले अनेक कुटुंब आपल्या गावी परत येत आहेत़ त्यामुळे मतदार यादीत झपाट्याने  वाढ होत असल्याचे चित्र आहे़  वाळूघाटांच्या लिलावानंतर यादीनुसार वाळूउपशाचा बोनस मिळत असल्याने अन्य गावांच्या तुलनेत  दहा गावांची मतदार यादी वाढली आहे.  पुन्हा मूळ गावात परतलेले मतदार नाव नोंदणीसाठी धडपडत आहेत.

बिलोली तालुका मांजरा नदीतील लाल वाळूसाठी प्रसिद्ध आहे. तेलंगणा सीमावर्ती असलेल्या मांजरा नदीपात्रात वेगवेगळ्या गावांत दहा शासकीय वाळूघाट आहेत. बॅक वॉटरच्या माध्यमातून वाळूमय होणार्‍या खाजगी शेतकर्‍यांचे ३० ते ३५ वाळूपट्टे आहेत. प्रत्येक गावच्या ग्रामसभेतील वाळू उपशाकरिता ग्राम ठराव आवश्यक आहे. ग्रामसभेतंर्गत वाळूच्या संदर्भात  ना-हरकत ठराव आल्यानंतर शासन वाळूउपशाची प्रक्रिया  सुरु करते. त्यानंतर पाच वेगवेगळ्या विभागातंर्गत सर्वेक्षण करुन वाळूसाठा निश्चित केला जातो. ग्रामसभेचा ठराव महत्त्वाचा असल्याने गावातील प्रत्येक नागरिकाला  महत्त्व आलेले आहे.

सीमावर्ती मांजरा नदीकाठावर सगरोळी, माचनूर, नागणी, हुनगुंदा, येसगी, गंजगाव, कार्ला व बोळेगाव ही गावे मोडतात. गोदावरी नदीकाठावर चिटली, कोळगाव हे वाळूघाट येतात. सध्या दहा वाळू घाटांपैैकी शासकीय सहा घाटांचा वाळू लिलाव झालेला आहे तर खाजगी वाळूपट्ट्यांची परवानगी जिल्हा कार्यालयाकडून प्रतीक्षेत आहे. तालुक्याची दरवर्षीची मार्च-एण्ड महसूल सरासरी पाहता पुढच्या महिन्यात खाजगी पट्ट्याचा मार्ग मोकळा होईल असे दिसते. शासकीय घाटांचा उर्वरित लिलाव तीन टप्प्यात द्यावा लागतो. संंबंधित सर्वे वाळू घाट प्रत्येक गावांशी संबंधित आहेत. वाळू उपशापोटी त्या गावातील मजुरांना रोजगार मिळतो. पण आता मागच्या पाच वर्षांपासून अशा गावातील चित्र बदलले आहे. गावकर्‍यांना वाळू उपशापोटी ठरावीक बोनस अथवा टक्केवारी देण्याची प्रथा सुरु झाली. परिणामी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना महत्त्व प्राप्त झाले आहे. 

गावच्या मतदार यादीनुसार  सर्वांनाच वाळू बोनस वाटप होत असल्याने मतदारयादी  महत्त्वाची ठरत आहे. दहा वर्षांपासून गाव सोडून स्थलांतर झालेले मतदार पुन्हा आपल्या मूळ गावी नावनोंदणीसाठी धडपडत आहेत. निवडणूक विभागाकडून दर तीन महिन्याला  मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जातो. वाळू पट्ट्याच्या व वाळू घाटातील मतदार नोंदणी आघाडीवर आहे. एकीकडे शासन महसूल वाढीसाठी सातत्याने गौण खनिजाचा लिलाव करते. त्यामुळे वाळूघाटांना  कोट्यवधीची बोली लागते व वाळू घाट गावात करोडोंची उलाढाल होते.  सततच्या ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागली आहे. पर्यावरणावर परिणाम होऊन पाणीपातळी खालावते; पण अशा परिस्थितीत वाळू बोनस मिळत  आहे़ 

सीमावर्ती मांजरा नदीकाठावर सगरोळी, माचनूर, नागणी, हुनगुंदा, येसगी, गंजगाव, कार्ला व बोळेगाव ही गावे मोडतात. गोदावरी नदीकाठावर चिटली, कोळगाव हे वाळूघाट येतात. सध्या दहा वाळू घाटापैैकी शासकीय सहा घाटांचा वाळू लिलाव झालेला आहे तर खाजगी वाळूपट्ट्यांची परवानगी जिल्हा कार्यालयाकडून प्रतीक्षेत आहे. 

कागदपत्रांची बारकाईने तपासणीअन्य गावांच्या तुलनेत वाळू पट्ट्यांच्या या गावांतून मतदार नोंदणीसाठी सतत अर्ज येतात. आलेल्या अर्जाची बारकाईने तपासणी करुन अर्ज स्वीकारले जात आहेत. स्थलांतरित झालेले मतदार पुन्हा या गावात नाव नोंदविण्यासाठी अर्ज देतात. त्यावेळी संबंधित गावात वगळणी अर्जाची नोंद केल्यानंतरच आॅनलाईन प्रक्रिया केली जाते. एकूणच वाळूघाटांच्या दहा-बारा गावांतील मतदार जागरुक झाल्याचे चित्र दिसून येते. वयाची १८ वर्षे पूर्ण होते ना होते तोच नाव नोंदणीचा अर्ज दाखल होतो, अशी स्थिती आहे. - आर. जी. चौहान (नायब तहसीलदार निवडणूक विभाग, बिलोली)

टॅग्स :ElectionनिवडणूकNandedनांदेड