शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विष्णूपुरी पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:12 IST

महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़

ठळक मुद्दे१३ कोटी २४ लाख थकबाकीपोटी तोडला वीजपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेचा फटका शुक्रवारी विष्णूपुरी प्रकल्पाला बसला़ चार वर्षानंतर काही महिन्यांपूर्वीच विष्णूपुरी प्र्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ परंतु प्रकल्पाच्या थकबाकीचे शुक्लकाष्ठ अजून संपले नसून महावितरणने १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला़ त्यामुळे पुन्हा एक प्रकल्प अंधारात गेला आहे़विष्णूपुरी प्रकल्पावर गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास ४० कोटींपेक्षा अधिकची थकबाकी होती़ त्यामुळे महावितरणने प्रकल्पाचा वीजपुरवठा तोडला होता़ त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प अंधारातच होता़ पावसाळ्याच्या काळात प्रकल्पाचे दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी दोन जनित्राची सोय करण्यात आली होती़ प्रकल्प भरल्यानंतर जनित्राच्या माध्यमातूनच दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत होते़ विजेवर किंवा जनित्राद्वारे दरवाजे उचलण्यासाठी सारखाच म्हणजे ४५ मिनिटांचा वेळ लागत होता़त्यामुळे पाटबंधारे विभागानेही प्रकल्पाची थकबाकी देवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत कुठल्याही हालचाली केल्या नव्हत्या़ मागील वर्षी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौºयावर आले होते़ यावेळी आ़ हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून थकबाकीतून थोडा दिलासा मिळाला होता़ त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच प्रकल्पाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता़ त्यात आता महावितरणने शून्य थकबाकीची मोहीम सुरु केली आहे़ या मोहिमेचा फटका प्रकल्पाला बसला आहे़ प्रकल्पाकडे आजघडीला असलेल्या १३ कोटी २४ लाखांच्या थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे़ त्यामुळे प्रकल्प पुन्हा अंधारात गेला आहे़ त्यामुळे लोकप्रतिनिधींना थकबाकीसाठी पुन्हा राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे़ मात्र या ठिकाणी रात्रपाळीला कार्यरत असलेल्या पाटबंधारे व पोलीस कर्मचाºयांची त्यामुळे मोठी गैरसोय होणार आहे़विष्णूपुरी प्रकल्पाकडे असलेल्या थकबाकीसंदर्भात यापूर्वीही अनेकवेळा महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता़ त्यामुळे पाटबंधारे विभागाने दरवाजे उचलण्यासाठी या ठिकाणी जनित्र आणून ठेवले