शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पैनगंगेचे पाणी ओसरल्याने ३५ तासानंतर विदर्भ-मराठवाड्याची वेटिंग संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:29 IST

बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देअखेर दुपारनंतर वाहतूक सुरू

नांदेड : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने विदर्भ-मराठवाडा जोडणाऱ्या पुलावर सुमारे ३५ तास वाहतूक ठप्प होती. गुरुवारी सकाळनंतर पुलावरील पाणी हळूहळू कमी झाल्याने दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांची खानपाणाची बरीच गैरसोय झाली. हदगाव-उमरखेड मार्गावर हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उमरखेडचे संबंधित अधिकारी हे जातीने उपस्थित होते. १५ मिनिटे हदगावचे आणि १५ मिनिटे उमरखेडची अशा पद्धतीने वाहने सोडण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. ३५ तासापासून वाहतूक थांबल्याने उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याशिवाय अनेक प्रवासी हदगाव-उमरखेडमध्ये अडकून पडले होते. अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवण, पिण्याच्या पाण्याची, फळांची सोय केली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ वाजता जुना पूल नांदेड येथील पाण्याची पातळी ३५३.१० मीटर झाली होती. पुलाची अलर्ट लेवल ३५१ मीटर तर धोकादायक पातळी ३५४ मीटरची आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाचे पाणी विष्णुपूरीत पोहोचल्यानंतर नदीकाठच्या लोकांना धोका निर्माण होवू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या काही जणांना महापालिकेने निवारा केंद्रात हलवले आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडTrafficवाहतूक कोंडी