शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

पैनगंगेचे पाणी ओसरल्याने ३५ तासानंतर विदर्भ-मराठवाड्याची वेटिंग संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 19:29 IST

बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्देअखेर दुपारनंतर वाहतूक सुरू

नांदेड : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने विदर्भ-मराठवाडा जोडणाऱ्या पुलावर सुमारे ३५ तास वाहतूक ठप्प होती. गुरुवारी सकाळनंतर पुलावरील पाणी हळूहळू कमी झाल्याने दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. 

बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांची खानपाणाची बरीच गैरसोय झाली. हदगाव-उमरखेड मार्गावर हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उमरखेडचे संबंधित अधिकारी हे जातीने उपस्थित होते. १५ मिनिटे हदगावचे आणि १५ मिनिटे उमरखेडची अशा पद्धतीने वाहने सोडण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. ३५ तासापासून वाहतूक थांबल्याने उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याशिवाय अनेक प्रवासी हदगाव-उमरखेडमध्ये अडकून पडले होते. अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवण, पिण्याच्या पाण्याची, फळांची सोय केली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ वाजता जुना पूल नांदेड येथील पाण्याची पातळी ३५३.१० मीटर झाली होती. पुलाची अलर्ट लेवल ३५१ मीटर तर धोकादायक पातळी ३५४ मीटरची आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाचे पाणी विष्णुपूरीत पोहोचल्यानंतर नदीकाठच्या लोकांना धोका निर्माण होवू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या काही जणांना महापालिकेने निवारा केंद्रात हलवले आहे.

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडTrafficवाहतूक कोंडी