शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी गावांतील मतदानावरील बहिष्कार मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:18 IST

विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हिमायतनगर: विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनवेवाडी आदिवासी बहुलगाव आहे़ हे स्वातंत्र्य काळापासून रस्ता व इतर सुविधांचा अभाव आहे़ येथील नागरिकांनी रस्ता व इतर सुविधासाठी मिळण्यासाठी दीड महिन्याभरापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. हदगावचे उपविभागीय अधिकारी वडदकर यांनी सदरील गावासियांना रस्त्यासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे कागोदपत्री पाठपुरावा केल्याने त्या संदर्भाचे लेखीपत्र ४ रोजी तहसीलदार जाधव यांच्या हस्ते गावकऱ्यांना देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला. लेखी स्वरुपात आम्हाला पत्र देण्यात यावे तरच मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात येईल, असा निर्धार गावक-यांनी घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर रस्त्याचे काम १४ व्या वित्तआयोगातून मार्गी लागले जाईल आणि इतर मागण्यासंदर्भात शासन दरबारी कागोदपत्री पाठपुरावा करुन निराकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार जाधव यांंनी दिल्याने गावक-यांनी नियोजित बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे लेखी पत्र गावक-यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

  • रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी वारंवार पाठपुरावा करीत होते. मात्र प्रशासन काही दाद देत नसल्याने गावक-यांनी लोकसभा निवडणुकीवरील मतदानावर बहिष्कार घालू, असे लेखी निवेदन संबंधितांना दिले. निवेदनानंतर प्रशासन जागे झाले आणि त्यांनी गावक-यांनी मनधरणी सुरु केली. मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या, तरच बहिषकार मागे घेवू, अशी भूमिका गावक-यांनी घेतली. तहसीलदारांनी लेखी दिल्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेड