शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

अवकाळी पावसाने लाखोंची हळद भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीट हॉल परिसरातील गाळ्यांसमोर अवकाळी पावसाचे पाणी साचून लाखो रुपयांची हळद भिजली. ...

नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बीट हॉल परिसरातील गाळ्यांसमोर अवकाळी पावसाचे पाणी साचून लाखो रुपयांची हळद भिजली. यात व्यापाऱ्यांसह काही शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. या परिसरात नाल्या नसल्याने आणि इतर ठिकाणचे पाणीही याच ठिकाणी येऊन साचल्याने धावपळ करूनही हळदीचे संरक्षण करता आले नाही.

नवीन मोंढा परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापाऱ्यांच्या माध्यमातून लाखो क्विंटल हळदीची दरवर्षी खरेदी करण्यात येते. बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात; परंतु मागील काही वर्षांपासून बाजार समितींकडून शेतकऱ्यांऐवजी व्यापारी, खरेदीदारांचेच हित जोपासले जात आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील बहुतांश गोडाऊनवर व्यापाऱ्यांचाच ताबा आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल टाकू दिला जात नाही. यासंदर्भात समितीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही गोडाऊन खाली करण्यात आलेले नाहीत. व्यापारी अथवा शेतकरी पंधरा ते तीस दिवसांपर्यंत माल ठेवू शकतात; परंतु, मागील अनेक महिन्यांपासून काही प्रस्थापित व्यापाऱ्यांचा गोडाऊनवर ताबा असल्याने हंगामातील माल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना जागाच मिळत नाही. परिणामी शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी साचून हळद भिजली. शेतकऱ्यांची ही नुकसानभरपाई कोण भरून देणार, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. हळदीबरोबरच काही व्यापाऱ्यांचा चना, तूरही भिजली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

चौकट

आतापर्यंत दीड लाख कट्टे हळद खरेदी

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ५४ हजार ७०७ कट्टे हळद खरेदी करण्यात आली आहे. साडेसहा हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे, तसेच भुईमूग शेंगा ९ हजार ३८७ पोती, ज्वारी १ हजार ३६ कट्टे, चना- ११ हजार ९८७, तूर - १ हजार ९२२ कट्टे, सोयाबीन - १२ हजार ९४८, तर गहू ११२२ कट्टे खरेदी करण्यात आले आहेत.

जवळपास चाळीस पोती हळद विक्रीसाठी शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे विक्रीसाठी आणली होती. माल दुकानासमाेर टाकलेला होता. त्यातील बहुतांश हळद शुक्रवारच्या पाण्याने भिजली. ही नुकसानभरपाई कोण भरून देणार. - नानाराव कदम, शेतकरी गणपूर.

बाजार समितीच्या परिसरातील काही व्यापाऱ्यांचा माल अवकाळी पावसामुळे भिजला आहे. ही नैसर्गिक हानी आहे. शेडमध्ये जागा उपलब्ध आहेत; परंतु सदर माल विक्रीसाठी बाहेर ठेवलेला होता आणि त्याचवेळी अचानक पाऊस येऊन शेतमाल भिजला आहे. यासंदर्भाने काही तक्रार आली तर चौकशी करू. -

साहेबराव बाऱ्हाटे, सचिव, कृउबा समिती, नांदेड.