शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात ...

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत होते. परंतु दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह होती. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लाटेत तब्बल दोन महिन्यांहून अधिक दिवस लॉकडाऊनमध्ये नागरिक अडकून पडले होते. आता मात्र रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार, विवाह समारंभ, कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गासह सर्वच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला काही तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्ग धास्तावला होता. लग्नसराई, सण-समारंभांचे सिझन हातचे गेले होते. त्यामुळे लॉकडाऊनमधून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, जिम, लग्न समारंभ यासह सर्वच कार्यक्रमांना पहिल्या स्तरात असल्यामुळे मुभा मिळाली आहे.

काय सुरू राहील?

नांदेड जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पहिल्या स्तरात येतो.

त्यामुळे या ठिकाणी मॉल, जिम, थिएटर यासह सर्वच बाबी उघड्या राहणार आहेत.

सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि इतर प्रवासी गाड्यांनाही आता पूर्ण क्षमतेने वाहतूक करता येणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून मॉल, जिम यासह इतर सार्वजनिक ठिकाणे बंद होती. ती आता उघडण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट यासह खानावळी, लग्न समारंभ यांनाही परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वच व्यवहार राहतील सुरू

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त १.९३ असल्यामुळे नांदेडचा समावेश पहिल्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. पहिल्या स्तरात दुकाने व इतर व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवता येणार आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या नियमानुसार पूर्वीप्रमाणे आपले व्यवहार सुरु ठेवता येतील. परंतु व्यवहार सुरू ठेवताना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीलाही मुभा आहे. परंतु इतर राज्यातील वाहतुकीसंदर्भात काही नियम व अटी घालून दिल्या आहेत.