शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात ...

नांदेड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत होते. परंतु दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह होती. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. दुसऱ्या लाटेत तब्बल दोन महिन्यांहून अधिक दिवस लॉकडाऊनमध्ये नागरिक अडकून पडले होते. आता मात्र रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहार, विवाह समारंभ, कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गासह सर्वच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला काही तास दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु रुग्णसंख्या वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे व्यापारी वर्ग धास्तावला होता. लग्नसराई, सण-समारंभांचे सिझन हातचे गेले होते. त्यामुळे लॉकडाऊनमधून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता सोमवारपासून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, जिम, लग्न समारंभ यासह सर्वच कार्यक्रमांना पहिल्या स्तरात असल्यामुळे मुभा मिळाली आहे.

काय सुरू राहील?

नांदेड जिल्हा शासनाने ठरवून दिलेल्या निकषात पहिल्या स्तरात येतो.

त्यामुळे या ठिकाणी मॉल, जिम, थिएटर यासह सर्वच बाबी उघड्या राहणार आहेत.

सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीला पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि इतर प्रवासी गाड्यांनाही आता पूर्ण क्षमतेने वाहतूक करता येणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून मॉल, जिम यासह इतर सार्वजनिक ठिकाणे बंद होती. ती आता उघडण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट यासह खानावळी, लग्न समारंभ यांनाही परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वच व्यवहार राहतील सुरू

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट फक्त १.९३ असल्यामुळे नांदेडचा समावेश पहिल्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. पहिल्या स्तरात दुकाने व इतर व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू ठेवता येणार आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलेल्या नियमानुसार पूर्वीप्रमाणे आपले व्यवहार सुरु ठेवता येतील. परंतु व्यवहार सुरू ठेवताना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीलाही मुभा आहे. परंतु इतर राज्यातील वाहतुकीसंदर्भात काही नियम व अटी घालून दिल्या आहेत.