शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कमी वजनाच्या बालकांना मृत्यूचा फास; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाच दिवसांत २७ बालकांचा मृत्यू

By शिवराज बिचेवार | Updated: October 7, 2023 05:51 IST

जन्मानंतर बहुतांश बालकांचे वजन कमी

शिवराज बिचेवार

नांदेड : नऊ महिन्यांच्या काळात चार वेळेस सोनोग्राफी करावी, असे जागतिक मानके सांगतात; परंतु, विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या अनेक नवजात बालकांच्या आईची नऊ महिन्यांत एक ते दोन वेळेसच सोनोग्राफी झाल्याचे आढळून आले. काहींनी तर नऊ महिन्यांत एकदाही सोनोग्राफी केली नव्हती. त्यामुळे प्रसूतीपूर्वीच पोटातील बाळाचे वजन किंवा व्यंग याबाबत ते अनभिज्ञ होते. परिणामी, जन्मानंतर यातील बहुतांश बालके ही अडीच किलोपेक्षाही कमी वजनाची भरली अन् मृत्यूने त्यांच्यावर फास आवळला. गेल्या पाच दिवसांत रुग्णालयात एकूण २७ बालकांची प्राणज्योत मालवली आहे. 

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिमसह शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या ठिकाणी प्रसूती कक्षात दिवसाला २५ हून अधिक प्रसूती होतात.  त्यातही नॉर्मल डिलिव्हरींची संख्या अधिक असते; परंतु, गर्भधारणा झाल्यानंतर ग्रामीण भागात अनेक महिलांची सोनोग्राफीच केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

बालकांवर उपचार का जिकिरीचे? 

रुग्णालयात प्रसूतीनंतर जन्माला आलेले बाळ हे कमी वजनाचे भरते.

या बालकांवर उपचार करणे जिकिरीचे होऊन बसते. कमी वजनामुळे त्यांच्या फुप्फुसाचा विकास होत नाही.

परिणामी, त्यांना श्वास घेण्यासही अडचण होते. याच कारणामुळे रुग्णालयात बहुतांश बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून भ्रष्टाचाराची साथ विभागाला लागली आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची सीबीआयमार्फत चौकशी करा.  

- उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)

अनेक बालके जन्मापासूनच अत्यवस्थ

जन्माच्या वेळी बाळाचे वजन अडीच ते चार किलो हे योग्य समजले जाते. त्यापेक्षा कमी वजनाची बालके अत्यवस्थ समजली जातात.

रुग्णालयात मरण पावलेली अनेक बालके ही अडीच किलोपेक्षा कमी वजनाची होती. नऊ महिने नऊ दिवस ही प्रसूतीसाठी योग्य वेळ असते; परंतु, अनेक महिलांची सातव्या किंवा आठव्या महिन्यातच प्रसूती होते.

आईच्या पोटात असताना त्यांना आहार आणि ऑक्सिजन मिळतो; परंतु, बाहेर पडताच त्याला श्वसनाचा त्रास होतो, अशी माहिती बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. किशोर राठोड यांनी दिली.