शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कमी वजनाच्या बालकांना मृत्यूचा फास; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाच दिवसांत २७ बालकांचा मृत्यू

By शिवराज बिचेवार | Updated: October 7, 2023 05:51 IST

जन्मानंतर बहुतांश बालकांचे वजन कमी

शिवराज बिचेवार

नांदेड : नऊ महिन्यांच्या काळात चार वेळेस सोनोग्राफी करावी, असे जागतिक मानके सांगतात; परंतु, विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या अनेक नवजात बालकांच्या आईची नऊ महिन्यांत एक ते दोन वेळेसच सोनोग्राफी झाल्याचे आढळून आले. काहींनी तर नऊ महिन्यांत एकदाही सोनोग्राफी केली नव्हती. त्यामुळे प्रसूतीपूर्वीच पोटातील बाळाचे वजन किंवा व्यंग याबाबत ते अनभिज्ञ होते. परिणामी, जन्मानंतर यातील बहुतांश बालके ही अडीच किलोपेक्षाही कमी वजनाची भरली अन् मृत्यूने त्यांच्यावर फास आवळला. गेल्या पाच दिवसांत रुग्णालयात एकूण २७ बालकांची प्राणज्योत मालवली आहे. 

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिमसह शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या ठिकाणी प्रसूती कक्षात दिवसाला २५ हून अधिक प्रसूती होतात.  त्यातही नॉर्मल डिलिव्हरींची संख्या अधिक असते; परंतु, गर्भधारणा झाल्यानंतर ग्रामीण भागात अनेक महिलांची सोनोग्राफीच केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

बालकांवर उपचार का जिकिरीचे? 

रुग्णालयात प्रसूतीनंतर जन्माला आलेले बाळ हे कमी वजनाचे भरते.

या बालकांवर उपचार करणे जिकिरीचे होऊन बसते. कमी वजनामुळे त्यांच्या फुप्फुसाचा विकास होत नाही.

परिणामी, त्यांना श्वास घेण्यासही अडचण होते. याच कारणामुळे रुग्णालयात बहुतांश बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून भ्रष्टाचाराची साथ विभागाला लागली आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची सीबीआयमार्फत चौकशी करा.  

- उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)

अनेक बालके जन्मापासूनच अत्यवस्थ

जन्माच्या वेळी बाळाचे वजन अडीच ते चार किलो हे योग्य समजले जाते. त्यापेक्षा कमी वजनाची बालके अत्यवस्थ समजली जातात.

रुग्णालयात मरण पावलेली अनेक बालके ही अडीच किलोपेक्षा कमी वजनाची होती. नऊ महिने नऊ दिवस ही प्रसूतीसाठी योग्य वेळ असते; परंतु, अनेक महिलांची सातव्या किंवा आठव्या महिन्यातच प्रसूती होते.

आईच्या पोटात असताना त्यांना आहार आणि ऑक्सिजन मिळतो; परंतु, बाहेर पडताच त्याला श्वसनाचा त्रास होतो, अशी माहिती बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. किशोर राठोड यांनी दिली.