शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेत नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंब पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:15 IST

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार असून या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार २६२ कुटुंब पात्र ठरली आहेत़

ठळक मुद्दे११२२ रोगांवर होणार उपचार, सध्या दोन रुग्णालये संलग्न

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार असून या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार २६२ कुटुंब पात्र ठरली आहेत़ या योजनेअंतर्गत ११२२ रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत़केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून नांदेड जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे़ आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे, दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंबप्रमुख, १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाही, अशा कुटुंबांचा या योजनेत सहभाग आहे.तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेस पात्र आहेत. या कुटुंबाना दरवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण राहणार आहे.या योजनेतंर्गत त्या कुटुंबांना ठरावीक आजारासाठी देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येणार असून त्यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई- कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील, त्या रुग्णालयातील आरोग्यमित्र हे ई-कार्ड देतील. सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी व उपजिल्हा रूग्णालय, मुखेड हे दोन रुग्णालय संलग्नित करण्यात येणार आहेत. तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य ही योजना कार्यान्वित आहे.आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे.आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे, हे या योजनेचे वैशिष्टे आहे़ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने व कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य