शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उमरीचे कृषी अधिकारीपद दोन वर्षांपासून रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:05 IST

उमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देबिलोलीला सहा वर्षांनंतर मिळाले कृषी अधिकारी, कार्यालयातील १२ पदे अद्यापही रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.शेती संपन्न असलेल्या उमरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिका-याचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तालुक्यात अनेक शेतकरी नवनवीन शेती विषयक उपक्रम राबवून पुढे येत आहेत़ मात्र उमरी येथे कृषी अधिकारी नसल्याने त्यांना शासनाच्या नवीन उपक्रमांची व योजनांची पुरेशी माहिती मिळत नाही. आतापर्यंत बाहेरील तालुक्याच्या कृषी अधिका-यांना येथील तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. आजवर त्यांच्याकडूनच उमरी तालुक्याचे काम करवून घेतल्या गेले. महिन्यातून एक-दोन वेळा उमरीला येऊन हे अधिकारी थातूरमातूर काम पाहत असत. उमरी तालुक्यातील शेतक-यांसाठी येणा-या विविध योजना तसेच कृषी कार्यालयाशी संबंधित कामेही वेळेवर होत नसत़ त्यामुळे शेतक-यांना सतत अडीच वर्षांपासून या गैरसोयींचा सामना करावा लागला. गेल्या अडीच महिन्यांपूर्वी हिंगोली येथून गरजे यांची उमरीला बदली झाल्याचे आदेश काढण्यात आले. तेव्हापासून गरजे हे अद्यापपावेतो उमरीला रुजू झाले नाहीत. उमरी तालुक्यात पीक विम्यासंदर्भात शेतक-यांच्या असंख्य तक्रारी आहेत. पीकविम्याच्या हप्त्यापोटी मोठ्या प्रमाणात रकमा भरूनही शेतक-यांना मात्र दोनशे ते अडीचशे रुपये असा अत्यंत तोकड्या स्वरूपात पीकविमा मिळाला़याबाबत शेतक-यांनी उमरी कृषी कार्यालयात चौकशी केली़ मात्र येथे तालुक्याचा मुख्य अधिकारीच नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. अशा विविध प्रकारच्या शेतक-यांच्या समस्या असून येथे पूर्णवेळ स्वतंत्र पदभार असलेला तालुका कृषी अधिकारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.तालुक्यात १२ सज्जे असून दोन कृषी पर्यवेक्षक व एक मंडळ कृषी अधिकारी अशी पदे आहेत. तालुक्यात ६२ गावांतून येणारे शेतकरी आपल्या शेतीविषयक अनेक समस्या घेऊन येताना दिसतात. मात्र येथे तालुका कृषी अधिकारी नसल्याने आपले गा-हाणे सांगावे तरी कुणाला? अशी स्थिती झाली आहे.---बिलोलीतील पदे भरा, अन्यथा आंदोलनबिलोली : येथील तालुका कृषी अधिकारी पद तब्बल सहा वर्षानंतर भरण्यात आले आहे. मात्र अद्यापही येथे बारा पदे रिक्त असून शेतक-यांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो.तालुका कृषी अधिकारी पदी मुदखेड येथून विजय घुगे यांनी पदभार स्वीकारला. तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार मागील सहा वर्षांपासून प्रभारी तर कधी अतिरिक्त राहत आलेला आहे़ पर्यवेक्षकासह येथे १२ पदे रिक्त आहेत. पावसाळापूर्व पालिका विरोधी पक्षनेता अनुप अंकुशकर यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. सन २०१२ मध्ये कृषी अधिकारी जहूर खान यांची बदली झाल्यानंतर वर्ग २ चे पद सतत रिकामेच होते. प्रभारी पदामुळे सातत्याने कामे खोळंबत असत. तालुक्यातील २ पालिका व ७३ ग्रामपंचायतअंतर्गत ५० हजारांपेक्षा जास्त शेतकरी आहेत. सातत्याने पदे रिक्त असल्याने शेतक-यांच्या अडचणी येत आहेत. उर्वरीत रिक्त पदे भरावीत अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा अंकुशकर यांनी दिला. सध्या शेती हंगाम असून कृषी पदांची आवश्यकता आहे. प्रशासनाने रिक्त पदे भरुन शेतीची व शेतक-यांच्या अडचणी सोडवाव्यात. प्रमुख पदे नेहमीच रिक्त राहण्याचा सपाटा सुरु आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagricultureशेती