शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 20:17 IST

२ लाख ६५ हजारांपैकी अवघ्या ६५ हजार शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज

ठळक मुद्देजिल्ह्यात केवळ १७ टक्के कर्ज वाटप 

नांदेड : खरिपाची जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झालेली असताना अद्यापर्यंत मागणी केलेल्या शेतकऱ्यांनी खरीप पीक कर्ज उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्याला दिलेला लक्षांंक केवळ दिखावाच दिसत आहे़ नोंदणी केलेल्या  २ लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी ६५ हजार १३ शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप केले आहे़ तर दोन लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे़ 

नांदेड जिल्ह्यासाठी २ हजार ५३९ कोटी रूपये कर्ज वाटपाचा लक्षांक देण्यात आला आहे़ त्यापैकी सर्वाधिक २ हजार ३१ कोटी रूपयांचा लक्षांक हा खरिपासाठी आहे़ उन्हाळ्यानंतर खरीप पेरण्या होतात़ या दरम्यान, शेतकऱ्यांकडे पैसा नसतो आणि पेरणीसाठी सहज पैसे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासनाकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते़ परंतु, हा उद्देश केवळ कागदोपत्रीच ग्राह्य धरला जात असल्याने शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढत असल्याचे  चित्र जिल्हाभरात आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना गुंडळण्याच्या हालचाली सुरू असल्याने सर्वच खासगी बँकांनी यंदा पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे़ त्यातच कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोडमडलेली असताना यंदा शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

दरम्यान, जिल्ह्यातील ६५ हजार १३ शेतकऱ्यांना विविध बँकांनी ३४८ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २५८ कोटी २६ लाख रूपयांचे खरीप पीक कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वाटप करण्यात आले़ सदर बँकेस १८५ कोटींचे लक्षांक दिलेले असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५५ हजार १२५ शेतकऱ्यांना २५८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले़ लक्षांकापेक्षाही अधिक कर्ज वाटप करून विक्रमी        १३९ टक्के वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नावावर नोंदविल्या गेले  आहे़ 

आजपर्यंत जिल्ह्यातील व्यापारी, तसेच खासगी बँकांनी केवळ ३़२२ टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे़ १५५७ कोटी रूपयांचे लक्षांक असताना केवळ ५० कोटी रूपये वाटप केल्याचे दिसून येते. त्याचबरोबर ग्रामीण बँकेने १३़७६ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करत ५ हजार ७१२ शेतकऱ्यांना ३९ कोटी रूपयांचा कर्ज दिले़ जिल्ह्यातील ग्रामीण बँक, व्यापारी, खासगी बँकांनी आखडता हात घेतलेला असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेने  महामारीच्या काळात सर्वाधिक पीक कर्ज वाटप करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे़ 

खाजगी बँकांची चौकशी करण्याची गरज; लक्षांक देऊनही पीक कर्जाचे वाटप नाहीकोरोना महामारीच्या काळात शेतकरी अडचणीत असताना खासगी, व्यापारी तसेच ग्रामीण बँकेच्या विविध शाखांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात का ठेवला़  मागणी करूनही पीक कर्ज का वाटप केले जात नाही, यासंदर्भातील चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ बँकांना उद्दिष्ट देवून केवळ बोटावर मोजता येईल एवढेच टक्के पीक कर्ज वाटप होत आहे़ बहुतांश ठिकाणी गाव दत्तक असलेल्या बँकांकडून एकाही शेतकऱ्यास कर्ज दिलेले नाही तर इतर ठिकाणच्या वा शाखेच्या बँका संबंधित शेतकऱ्यांनाा दारात उभे राहू देत नाहीत़ त्यामुळे चालू बाकीदार असूनही कर्ज मिळत नसलेल्या लाखो शेतकऱ्यांना आजही कर्जाच्या         प्रतीक्षेत बँकांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

३०० कोटी : कर्ज वाटपाचा मानसमागील काही काळात बँकेची परिस्थिती चांगली नव्हती़ परंतु, संचालक मंडळाच्या प्रयत्नाने  आज बँक चांगल्या परिस्थितीत आहे़ त्यामुळे उद्दिष्टापेक्षाही जास्त पीक कर्ज वाटप करण्यात जिल्हा बँकेला यश येत आहे़ जास्तीत जास्त चालू बाकीदार सभासदांना कर्ज देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे़ येत्या काही दिवसांमध्ये मध्यवर्ती बँकेच्या बँक खातेदार शेतकऱ्यांना ३०० कोटी रूपयांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्याचा बँकेचा मानस आहे़- डॉ. सुनील कदम,अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीNandedनांदेड