शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

दोन दिवसांत किनवट आगाराच्या अवघ्या दहा बसेस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:17 IST

जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराला दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कोरोना या महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहा ...

जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराला दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कोरोना या महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवस संपूर्ण गाड्याचे चाक बंद झाल्याने या कालावधीत या आगाराला अर्ध्या कोटींचा फटका बसला आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर कसेबसे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली. मात्र, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी पुन्हा ‘ब्रेक द चेन’ लागू केला आहे. त्यामुळे गाड्यांना प्रवासीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच शनिवारी व रविवारी पूर्णतः दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडले नाही. या दोन दिवसांत ४७ पैकी केवळ दहाच बसेस धावल्या आहेत. या दहा बसेसच्या ५२ फेऱ्या झाल्या असून, ८ हजार ५०० किलोमीटर धावल्या आहेत. यापोटी केवळ १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न किनवट आगाराला मिळाले आहे.

.कोट..................

लग्न सराईत परिवहन महामंडळाला चांगले दिवस असतात. या कालावधीत एसटीला चांगले उत्पन्न मिळते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे एसटीला मोठा फटका सोसावा लागला. त्यातच ‘ब्रेक द चेन’चा किनवट आगाराला मोठा फटका बसला असून, या दोन दिवसांत गाड्या रिकाम्याच धावल्या आहेत.

- मिलिंद सोनाळे, आगार प्रमुख, किनवट

एकूण बसेस ४७

धावल्या बसेस १०

किलोमीटर ८५००

उत्पन्न १५००००

फेऱ्या ५२

एसटीकडून नियमांचे पालन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे महामंडळाकडून पालन करण्यात येत आहे. सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रवाशांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. मात्र, वरिष्ठांच्या सूचनेनुसार आवश्यकता आहे. तिथे गाड्या सोडल्या जात आहेत. प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत असल्याचेही एसटीच्या वतीने सांगण्यात आले.