शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:44 IST

केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे.

ठळक मुद्देकेळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी

- युनूस नदाफ

पार्डी : अर्धापूर तालुका हा केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात बहुतांश शेतकरी दोन्ही हंगामात केळीचे पीक घेतात. केळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. यातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या बाजारात पालेभाज्याचे दर आकाशाला भिडले आहेत. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. हेच लक्षात घेऊन अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास केळीचे उत्पन्न मिळणारच आहे, पण मिरचीचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात झाली आहे. या मिरचीपासून उत्पन्न मिळवित इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

गतवर्षापासून पिकांवर अस्मानी संकटाचा मारा बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर पर्यायी व पूरक व्यवसाय म्हणून मिरचीची लागवड केली आहे.  युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी जून महिन्यात बाराशे केळीची लागवड केली. केळी पाच बाय पाच या अंतरावर केली असून पाच बाय पाच ही रिकामी राहिलेल्या क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. एक एकरात बाराशे रोपांची लागवड केली. मिरचीची लागवड करून तीन महिन्यांच्या कालावधीतच मिरची तोडण्यास सुरुवात झाली आहे. दररोज वीस ते पंचवीस किलो तोडली जात आहे. सध्या बाजारात मिरचीला मागणी असल्याने मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. मिरचीचे दररोज एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिदिन उत्पन्न काढले जात आहे. 

आंतरपिकातील खतांच्या वापराबाबत नियोजनदररोज शेतकऱ्याच्या हातात खेळता पैसा मिळत असल्याने तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. मिरची आणखी एक ते दोन महिने उत्पन्न देत राहील, असे शेतकऱ्याने सांगितले. नांदेड, अर्धापूर, वसमत, वारंगा आदी बाजारपेठ उपलब्ध आहेत. कमी खर्चात या बाजारपेठेत जाता येते. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत जाऊन ठोक दरात विक्री करून परत येऊन शेतात  राहिले. काम पूर्ण केले जाते विशेष म्हणजे, ठिबक सिंचन योजना तसेच आंतरपिकाबाबत व खतांच्या वापराबाबतही त्यांनी योग्य नियोजन केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड