शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:44 IST

केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे.

ठळक मुद्देकेळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी

- युनूस नदाफ

पार्डी : अर्धापूर तालुका हा केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात बहुतांश शेतकरी दोन्ही हंगामात केळीचे पीक घेतात. केळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. यातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या बाजारात पालेभाज्याचे दर आकाशाला भिडले आहेत. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. हेच लक्षात घेऊन अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास केळीचे उत्पन्न मिळणारच आहे, पण मिरचीचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात झाली आहे. या मिरचीपासून उत्पन्न मिळवित इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

गतवर्षापासून पिकांवर अस्मानी संकटाचा मारा बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर पर्यायी व पूरक व्यवसाय म्हणून मिरचीची लागवड केली आहे.  युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी जून महिन्यात बाराशे केळीची लागवड केली. केळी पाच बाय पाच या अंतरावर केली असून पाच बाय पाच ही रिकामी राहिलेल्या क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. एक एकरात बाराशे रोपांची लागवड केली. मिरचीची लागवड करून तीन महिन्यांच्या कालावधीतच मिरची तोडण्यास सुरुवात झाली आहे. दररोज वीस ते पंचवीस किलो तोडली जात आहे. सध्या बाजारात मिरचीला मागणी असल्याने मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. मिरचीचे दररोज एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिदिन उत्पन्न काढले जात आहे. 

आंतरपिकातील खतांच्या वापराबाबत नियोजनदररोज शेतकऱ्याच्या हातात खेळता पैसा मिळत असल्याने तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. मिरची आणखी एक ते दोन महिने उत्पन्न देत राहील, असे शेतकऱ्याने सांगितले. नांदेड, अर्धापूर, वसमत, वारंगा आदी बाजारपेठ उपलब्ध आहेत. कमी खर्चात या बाजारपेठेत जाता येते. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत जाऊन ठोक दरात विक्री करून परत येऊन शेतात  राहिले. काम पूर्ण केले जाते विशेष म्हणजे, ठिबक सिंचन योजना तसेच आंतरपिकाबाबत व खतांच्या वापराबाबतही त्यांनी योग्य नियोजन केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड