शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

बाराशे केळीत बाराशे मिरची रोपे; तिखट मिरचीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 18:44 IST

केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे.

ठळक मुद्देकेळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी

- युनूस नदाफ

पार्डी : अर्धापूर तालुका हा केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात बहुतांश शेतकरी दोन्ही हंगामात केळीचे पीक घेतात. केळी पूरकव्यवसाय म्हणून लागवड केली जाते. यातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या बाजारात पालेभाज्याचे दर आकाशाला भिडले आहेत. बाजारात मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. हेच लक्षात घेऊन अर्धापूर तालुक्यातील देळूब ( बु.) येथील युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. केळी पाच बाय पाच अंतरावर लावली जाते. पाच बाय पाचमधील रिकाम्या क्षेत्रात राहिलेल्या मिरचीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यास केळीचे उत्पन्न मिळणारच आहे, पण मिरचीचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात झाली आहे. या मिरचीपासून उत्पन्न मिळवित इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

गतवर्षापासून पिकांवर अस्मानी संकटाचा मारा बसत आहे. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर पर्यायी व पूरक व्यवसाय म्हणून मिरचीची लागवड केली आहे.  युवा शेतकरी शैलेश लोमटे यांनी जून महिन्यात बाराशे केळीची लागवड केली. केळी पाच बाय पाच या अंतरावर केली असून पाच बाय पाच ही रिकामी राहिलेल्या क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे. एक एकरात बाराशे रोपांची लागवड केली. मिरचीची लागवड करून तीन महिन्यांच्या कालावधीतच मिरची तोडण्यास सुरुवात झाली आहे. दररोज वीस ते पंचवीस किलो तोडली जात आहे. सध्या बाजारात मिरचीला मागणी असल्याने मिरचीला ५० ते ६० रुपये किलो दर मिळत आहे. मिरचीचे दररोज एक हजार ते पंधराशे रुपये प्रतिदिन उत्पन्न काढले जात आहे. 

आंतरपिकातील खतांच्या वापराबाबत नियोजनदररोज शेतकऱ्याच्या हातात खेळता पैसा मिळत असल्याने तिखट मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात गोडवा आणला आहे. मिरची आणखी एक ते दोन महिने उत्पन्न देत राहील, असे शेतकऱ्याने सांगितले. नांदेड, अर्धापूर, वसमत, वारंगा आदी बाजारपेठ उपलब्ध आहेत. कमी खर्चात या बाजारपेठेत जाता येते. सकाळी लवकर उठून बाजारपेठेत जाऊन ठोक दरात विक्री करून परत येऊन शेतात  राहिले. काम पूर्ण केले जाते विशेष म्हणजे, ठिबक सिंचन योजना तसेच आंतरपिकाबाबत व खतांच्या वापराबाबतही त्यांनी योग्य नियोजन केले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड