शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द, पदवी अन्य प्रवेश कसे हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन इतर पर्यायांचा विचार करत होते. मागील दीड महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन इतर पर्यायांचा विचार करत होते. मागील दीड महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून कोणताही पर्याय निश्चित होत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले होते. परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेऊन मानसिक तणाव कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, आता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी झाला आहे; परंतु मूल्यमापन कशा पद्धतीने होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

प्राचार्य म्हणतात

१. बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी शाखांच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण निर्माण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्यांना अडचणीचे जाणार नाही.

-पवळे, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज, नांदेड

२. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष समोर आल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विद्या शाखांच्या प्रवेशाबाबतचा मार्ग या मूल्यमापनाच्या आधारेच सुटेल. -

विद्यार्थी म्हणतात-

१.मागील दीड महिन्यांपासून आम्ही या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. त्यामुळे आमचे अभ्यासात मन लागत नव्हते. परीक्षा होणार की नाही, हाच विचार येत होता. मात्र, आता या निर्णयामुळे समाधानी आहोत. मूल्यमापनाचे धोरण लवकर जाहीर करावे .

- यश लोंढे, विद्यार्थी

२. शासनाने यापूर्वीच हा निर्णय जर घेतला असता तर आम्ही मोकळ्या मनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचा अभ्यास करू शकलो असतो. आमचा मोठा वेळ वाया गेला आहे.

- शिवराज इंगळे, विद्यार्थी

पालक म्हणतात-

१. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, कोरोनामुळे ती घेता येणार नव्हती. शासनाने योग्यच निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करावे.

- सोमनाथ लांडगे, पालक

२. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य असून हा निर्णय अगोदरच घेणे आवश्यक होते. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करण्यास वेळ मिळाला असता. - भास्कर जाधव, पालक

बारावीनंतरच्या संधी

१.बारावीनंतर देशातील काेणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार या क्षेत्रात संधी आहेत.

२. एमबीबीएस व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील नीट गुणांच्या आधारे दिले जातात.

३. बारावीनंतर फार्मसीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. डी. फार्मसी हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येते.

४. बारावीची परीक्षा गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर या शाखेत प्रवेश मिळू शकतो. ही पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी नोकरी मिळू शकते.