शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

बारावी परीक्षा रद्द, पदवी अन्य प्रवेश कसे हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन इतर पर्यायांचा विचार करत होते. मागील दीड महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन इतर पर्यायांचा विचार करत होते. मागील दीड महिन्यांपासून परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून कोणताही पर्याय निश्चित होत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले होते. परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेऊन मानसिक तणाव कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, आता बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी झाला आहे; परंतु मूल्यमापन कशा पद्धतीने होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

प्राचार्य म्हणतात

१. बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी शाखांच्या प्रवेशासाठी मेरिट लावताना अडचण निर्माण होणार आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी असल्याने त्यांना अडचणीचे जाणार नाही.

-पवळे, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज, नांदेड

२. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे निकष समोर आल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशाची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विद्या शाखांच्या प्रवेशाबाबतचा मार्ग या मूल्यमापनाच्या आधारेच सुटेल. -

विद्यार्थी म्हणतात-

१.मागील दीड महिन्यांपासून आम्ही या निर्णयाची प्रतीक्षा करत होतो. त्यामुळे आमचे अभ्यासात मन लागत नव्हते. परीक्षा होणार की नाही, हाच विचार येत होता. मात्र, आता या निर्णयामुळे समाधानी आहोत. मूल्यमापनाचे धोरण लवकर जाहीर करावे .

- यश लोंढे, विद्यार्थी

२. शासनाने यापूर्वीच हा निर्णय जर घेतला असता तर आम्ही मोकळ्या मनाने वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचा अभ्यास करू शकलो असतो. आमचा मोठा वेळ वाया गेला आहे.

- शिवराज इंगळे, विद्यार्थी

पालक म्हणतात-

१. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, कोरोनामुळे ती घेता येणार नव्हती. शासनाने योग्यच निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन योग्य पद्धतीने करावे.

- सोमनाथ लांडगे, पालक

२. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाने जो निर्णय घेतला तो योग्य असून हा निर्णय अगोदरच घेणे आवश्यक होते. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करण्यास वेळ मिळाला असता. - भास्कर जाधव, पालक

बारावीनंतरच्या संधी

१.बारावीनंतर देशातील काेणत्याही संस्थेत प्रवेशासाठी पात्र ठरता येते. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून आयटी, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार या क्षेत्रात संधी आहेत.

२. एमबीबीएस व दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांप्रमाणेच इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील नीट गुणांच्या आधारे दिले जातात.

३. बारावीनंतर फार्मसीमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत. डी. फार्मसी हा दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असून औषध उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण, विक्री व विपणन, हॉस्पिटल फार्मसी, कम्युनिटी फार्मसी यामध्ये करिअर करता येते.

४. बारावीची परीक्षा गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर या शाखेत प्रवेश मिळू शकतो. ही पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी नोकरी मिळू शकते.