शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

ई-पासची यंत्रणा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

घरकुलाला पडल्या भेगा बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. ...

घरकुलाला पडल्या भेगा

बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. परंतु घरकुलाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे घरकुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच ड्रेनेज पाईपलाईनही वापराआधीच फुटली आहे. पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरत असल्याची तक्रार याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी केली आहे.

नाले सफाईला सुरुवात

धर्माबाद : तालुक्यातील पिंपळगाव येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून तसेच गावातील नवयुवकांनी गाव स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्यात येत असून, विद्युत दिव्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे. सरपंच मोहन भंडरवार, उपसरपंच प्रतिनिधी गंगाधर दुड्डे, ग्रामसेवक रवी सरोदे, आदी उपस्थित होते.

भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत द्या

अर्धापूर : कोरोना काळात भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलावंतांकडून करण्यात आली आहे. कोरोना काळात कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कामगार, मजूर यांना मासिक वेतन लागू केले आहे. परंतु, भजनी मंडळ, कीर्तनकार यांना अद्याप कोणतीच मदत करण्यात आली नाही.

वानराला जीवदान

लोहा : पार्डी शिवारातील शेतात विहिरीत पडलेल्या वानराला वनविभागाने प्रयत्न करून बाहेर काढले. पाण्याच्या शोधात आलेले वानर विहिरीत पडले होते. त्याला बाहेर पडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वानराला बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

पाण्यासाठी भटकंती

हदगाव : पळशी परिसरातील अनेक गावांत पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गावातील विहिरी, विंधन विहिरीची पाणी पातळी खालावली असून, अनेक ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत.

कंधार बसस्थानकात शुकशुकाट

कंधार : संचारबंदीमुळे जिल्ह्यात मोजक्याच बस सुरू असून, त्यामुळे कंधार येथील बसस्थानकात दिवसभरात ठराविक बसगाड्या येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. मागील महिनाभरापासून कंधार बसस्थानकात हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

विंधन विहिरीची पाणीपातळी घटली

मुदखेड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम झाला असून, पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसपिकाला पाणी द्यायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.