शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

ई-पासची यंत्रणा बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:19 IST

घरकुलाला पडल्या भेगा बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. ...

घरकुलाला पडल्या भेगा

बरबडा : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील २४८ लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने साडेपाच कोटी रुपये मंजूर केले. परंतु घरकुलाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे घरकुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच ड्रेनेज पाईपलाईनही वापराआधीच फुटली आहे. पावसाळ्यात अनेक घरांत पाणी शिरत असल्याची तक्रार याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी केली आहे.

नाले सफाईला सुरुवात

धर्माबाद : तालुक्यातील पिंपळगाव येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून तसेच गावातील नवयुवकांनी गाव स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करण्यात येत असून, विद्युत दिव्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहे. सरपंच मोहन भंडरवार, उपसरपंच प्रतिनिधी गंगाधर दुड्डे, ग्रामसेवक रवी सरोदे, आदी उपस्थित होते.

भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत द्या

अर्धापूर : कोरोना काळात भजनी मंडळी कलावंतांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलावंतांकडून करण्यात आली आहे. कोरोना काळात कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कामगार, मजूर यांना मासिक वेतन लागू केले आहे. परंतु, भजनी मंडळ, कीर्तनकार यांना अद्याप कोणतीच मदत करण्यात आली नाही.

वानराला जीवदान

लोहा : पार्डी शिवारातील शेतात विहिरीत पडलेल्या वानराला वनविभागाने प्रयत्न करून बाहेर काढले. पाण्याच्या शोधात आलेले वानर विहिरीत पडले होते. त्याला बाहेर पडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वानराला बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

पाण्यासाठी भटकंती

हदगाव : पळशी परिसरातील अनेक गावांत पाण्याचे स्रोत आटल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. गावातील विहिरी, विंधन विहिरीची पाणी पातळी खालावली असून, अनेक ठिकाणचे हातपंप बंद पडले आहेत.

कंधार बसस्थानकात शुकशुकाट

कंधार : संचारबंदीमुळे जिल्ह्यात मोजक्याच बस सुरू असून, त्यामुळे कंधार येथील बसस्थानकात दिवसभरात ठराविक बसगाड्या येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. मागील महिनाभरापासून कंधार बसस्थानकात हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

विंधन विहिरीची पाणीपातळी घटली

मुदखेड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. कडक उन्हामुळे विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम झाला असून, पाणीपातळी घटत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसपिकाला पाणी द्यायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.