शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

नदी पात्र स्वच्छतेसाठी वृक्षमित्रांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST

नांदेडची लोकसंख्या वाढल्याने व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेला महत्व न दिल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. ...

नांदेडची लोकसंख्या वाढल्याने व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेला महत्व न दिल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातील गोदावरी नदीचे प्रदूषण ही एक मोठी समस्या होय. याचे दुष्परिणाम येत्या काळात जाणवण्याचा अगोदर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. गोदावरी नदीतील पाण्याची प्रदूषण पातळी वाढली आहे. यामुळे सध्या जलपर्णीची वाढ ही गतिशीलपणे होत आहे. पाण्यातील माशा मरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता मोहीम आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमी राबवत आहेत. समाजात जनजागृती करून यास आळा बसवणे हा उद्देश या मागचा आहे, असे प्रतिपादन संतोष मुगटकर यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली असून येत्या तीन रविवारी सतत नदी घाट स्वच्छतेची मोहीम चालणार आहे. लोकांनी यात सहभाग घ्यावा असेही आवाहन टीमच्या वतीने त्यांनी केले. घरातूनच कचरा व कमीत कमी घाण पाणी नदी पात्रात आले नाही पाहिजे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एक थेंब दूषित पाण्यामुळे हजारो लिटर पाणी दूषित होते. लोकांना नदी पात्रात कचरा टाकू नये म्हणून जनजागृती या मोहिमेत केली जाणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन समाज, शासन, लोकप्रतिनिधी व बुद्धिजीवी लोकांच्या समन्वयकाने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करूया असे मत जलअभ्यासक प्रा. परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रीतम भराडिया यांनी नदीमध्ये घाण टाकून नदीचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. मोहिमेमध्ये वृक्षमित्र प्रीतम भराडिया, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रहलाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, अरूणपाल ठाकूर, मनोज गुंजावळे, लक्ष्मण गज्जेवार, नानाजी रामटेके, सतीश कुलकर्णी, शैलेश शहाणे, मालू, मनपा स्वच्छता निरीक्षक ढगे, मनपा उद्यान अधीक्षक डॉ. बेग तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.