शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

नदी पात्र स्वच्छतेसाठी वृक्षमित्रांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:26 IST

नांदेडची लोकसंख्या वाढल्याने व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेला महत्व न दिल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. ...

नांदेडची लोकसंख्या वाढल्याने व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सार्वजनिक स्वच्छतेला महत्व न दिल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातील गोदावरी नदीचे प्रदूषण ही एक मोठी समस्या होय. याचे दुष्परिणाम येत्या काळात जाणवण्याचा अगोदर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. गोदावरी नदीतील पाण्याची प्रदूषण पातळी वाढली आहे. यामुळे सध्या जलपर्णीची वाढ ही गतिशीलपणे होत आहे. पाण्यातील माशा मरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता मोहीम आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पर्यावरणप्रेमी राबवत आहेत. समाजात जनजागृती करून यास आळा बसवणे हा उद्देश या मागचा आहे, असे प्रतिपादन संतोष मुगटकर यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त या स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली असून येत्या तीन रविवारी सतत नदी घाट स्वच्छतेची मोहीम चालणार आहे. लोकांनी यात सहभाग घ्यावा असेही आवाहन टीमच्या वतीने त्यांनी केले. घरातूनच कचरा व कमीत कमी घाण पाणी नदी पात्रात आले नाही पाहिजे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. एक थेंब दूषित पाण्यामुळे हजारो लिटर पाणी दूषित होते. लोकांना नदी पात्रात कचरा टाकू नये म्हणून जनजागृती या मोहिमेत केली जाणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन समाज, शासन, लोकप्रतिनिधी व बुद्धिजीवी लोकांच्या समन्वयकाने गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करूया असे मत जलअभ्यासक प्रा. परमेश्वर पौळ यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रीतम भराडिया यांनी नदीमध्ये घाण टाकून नदीचे पावित्र्य नष्ट करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. मोहिमेमध्ये वृक्षमित्र प्रीतम भराडिया, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रहलाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, अरूणपाल ठाकूर, मनोज गुंजावळे, लक्ष्मण गज्जेवार, नानाजी रामटेके, सतीश कुलकर्णी, शैलेश शहाणे, मालू, मनपा स्वच्छता निरीक्षक ढगे, मनपा उद्यान अधीक्षक डॉ. बेग तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला.