शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:21 IST

ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला.

नांदेड : ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. केबल पाहणे महाग झाले. महागामोलाच्या प्लॅनचे पैसे भरुनही संबंधित चॅनेल कधी बंद केले जाईल, याचा नेम नाही. याप्रकाराला केबलमालक, संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत.‘ट्राय’च्या निर्देशानुसार नवीन टेरीफ प्लॅनची आखणी सुरु आहे. वजिराबाद, मोंढा, शिवाजीनगर, श्रीनगर, अशोकनगर, तरोडा खु., व बु., गणेशनगर, पावडेवाडीनाका आदी परिसरातील केबलचालकांचे कर्मचारी टेरीफ प्लॅन घेवून ग्राहकांच्या घरोघरी जात आहेत. प्लॅन फायनल करण्यापूर्वीच अनेकांचे केबल कनेक्शन बंद करण्यात आले. यासाठीची पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही. जेव्हा ग्राहकच स्वत:हून केबलचालकाकडे विचारणा करतो, तक्रार करतो तेव्हा त्याला नियम सांगितला जातो.नियमांची ज्यांना जाण आहे, असे ग्राहक केबल सुरु करण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण करा, पैसे घ्या आणि केबल सुरु करा, असे संबंधितांना सांगतात, त्यालाही चालक, तांत्रिक कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. तब्बल तीन ते चार दिवस यासाठी घेत आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतर फॉर्म भरल्या जातो, पैसे घेतल्या जातात आणि केबल कसेबसे सुरु केले जाते.

  • ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही संबंधित चॅनल कधी बंद होईल, याचा नेम नाही. अनेक ग्राहकांना असा अनुभव येत आहे. यासंदर्भात विचारणा करण्याऱ्यालाही व्यवस्थित उत्तरे दिले जात नाहीत. केबलचा तांत्रिक कर्मचारी मालकाकडे तर मालक कंट्रोलरुमकडे बोट दाखवून आम्ही काही करु शकत नाही, आमच्या हाती काही नाही. तुम्ही कंट्रोल रुमला संपर्क करा’, ‘फारतर आमची जिल्हाधिकारी, ट्रायकडे तक्रार करा’ अशी उत्तरे मिळत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. पैसे भरुनही हा वैताग कशासाठी? असा सवाल ग्राहकांचा आहे. अनेकांनी केबल बंद करण्याचा निर्णय घेतला तर काहींचे केबल चालक, तांत्रिक कर्मचारी यांच्याशी वाद होत असल्याचे चित्र आहे.
टॅग्स :NandedनांदेडTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय