शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

परराज्यातील वाहतूक ठेकेदारांचा काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:51 IST

तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत.

सगरोळी : तेलंगणा सीमावर्ती मांजरा नदीच्या वाळूघाटांना यावर्षी घरघर लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दंडात्मक व पोलीस कारवाईच्या भीतीने विशेषत: तेलंगणा व कर्नाटक येथून रेतीसाठी येणारे ट्रकमालक धास्तावले आहेत़ वाळू भरण्यासाठी अनेक ट्रकचालक- मालक नकार देत आहेत. वाळू उपशास प्रारंभ होऊन पंधरा ते वीस दिवस झाले. परराज्यातील दरवर्षी मोठ्या प्रमाणात येणारे ट्रक यावर्षी बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.मराठवाडा - तेलंगणा व कर्नाटक राज्याला दुभंगणारी मांजरा नदी लालस्फटिक आकाराच्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे. राज्याच्या कोपºयात असलेल्या मांजरा नदीपात्रात शासकीय व खाजगी असे जवळपास २० ते २५ वाळूघाट आहेत. दरवर्षी पावसाळा संपला की, सर्व घाटांचा लिलाव केला जात होता. पाच वर्षांपासून आॅनलाईन -ई- लिलाव, ई - निविदा पद्धती अंमलात आलेली आहे. सन २०१८-२०१९ अंतर्गत सगरोळी परिसरातून माचनूर, गंजगाव, बोळेगाव, हुनगुंदा, कार्ला (बु.), सगरोळी शासकीय घाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मांजराच्या तीनच घाटांना ठेकेदार मिळाले. बोळेगाव व कार्ला घाटाचे ठेकेदार रेती उत्खननास सुरू झालेल्या घाटाची स्थिती पाहून आपले घाट बंदच ठेवले आहेत.यावर्षी घाट सुरूवात झाल्याच्या प्रारंभीच जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी देगलूर येथे बनावट पावत्यांच्या संशयावरून २८ ट्रकवर दंडात्मक कारवाई केली. तर बिलोलीचे उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी सगरोळी घाटावरील अमर्याद वाळू वाहतुकीचे दोन ट्रक व माचनूर येथील तीन जेसीबीवर दंडात्मक कारवाई करून नियमबाह्य उत्खनन चालू देणार नाही, याची चुणूक दाखवून दिली.बिलोलीचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दैनंदिन फिरते व बैठे पथक नेमून सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच उत्खनन करता येईल अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला़ शिवाय पोलीस अधीक्षक संजय जाधव व नुरूल हसन यांच्या कारवाईचा दणका सुरुच आहे. यावर्षीच्या रेती ठेकेदारांची मोठी अडचण झाली आहे़ कित्येकदा वाहतूक करणाºया ट्रकची आडवा- आडवी व पकडून देण्याचे प्रकारही झाले. परराज्यातील ट्रकचालक -मालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आता हे ट्रकचालक - मालक न्यायालयाचे खेटे मारत आहेत.जुने ठेकेदार गेले, नवीन ठेकेदार आले अशी स्थिती सध्या घाटांची झाली आहे. एकूणच परराज्याच्या वाळू वाहतुकीवर अवलंबून करोडो रुपये गुंतवणूक करणारे ठेकेदार सध्या अडचणीत सापडले आहेते. वाळूसाठा उपलब्ध आहे ; पण अन्य राज्यांतील ट्रक येत नसल्याने घाटांना घरघर लागली आहे. तर दुसरीकडे अनेक घाटांवर दिवसरात्र अवैध वाळू उपसा सुरुच असून प्रशासनाचा महसूल मात्र बुडत आहे़दहा वर्षांपासून बिलोलीतून वाळू उपसासगरोळी परिसरातील मांजरा नदीच्या वाळूघाटातील लाल वाळू खत कारखान्यासाठीही वापरली जाते. सार्वजनिक व खाजगी बांधकामासाठी या वाळूला प्रथम पसंती आहे. तेलंगणात वाळू उपशाला बंदी आहे.खाजगी वाळू पट्ट््यासाठी मोठा आटापिटा त्या राज्यात करावा लागतो. दोन्ही राज्यांत वाळू वाहतूक व उपशाकरिता अनंत अडचणी असल्याने मागच्या दहा वर्षांपासूून बिलोलीच्या वाळू घाटांना महत्त्व आलेले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळू