शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोंढ्याने’ जपली सामूहिक विवाहाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:11 IST

लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देउपक्रमाची २९ वर्षे : मुलींचा विवाह अंगणातच थाटामाटात पडतोय पार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.सोमवारी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासूनच कोंढ्याच्या दिशेने वºहाडींची गर्दी दिसत होती. सकाळी १०.१७ चा मुहूर्त होता. विवाह सोहळ्यासाठी गावात भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. हा मंडप वºहाडींच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटेपासूनच गावातील तरूणांबरोबरच आबालवृद्ध विवाह सोहळ्याच्या लगबगीत होते. मुहूर्तावर हजारो वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सुमारे २० हजारांवर वºहाडींच्या भोजनाच्या पंगती पडू लागल्या. विवाहासाठी एवढी गर्दी असतानाही ग्रामस्थांच्या अचूक नियोजनामुळे कुठेही, कसलीही कमतरता नव्हती.या सोहळ्यासंदर्भात सांगताना गावातील ज्येष्ठ संभाजी पाटील कोंढेकर म्हणाले, विवाह सोहळ्यावेळी मुलीच्या वडिलांवर आर्थिक ताण येतो. अनेकजण कर्जबाजारी होतात, हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. या हेतूने २९ वर्र्षांपूर्वी कोंढा ग्रामस्थांनी एकत्रित येवून गावातील मुलींचे विवाह सामूहिक सोहळ्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी हरिभाऊ कदम, रामराव कोंढेकर, दादाराव कोंढेकर, गणेश कोंढेकर, बबन कोंढेकर, बाबूराव कोंढेकर यांच्यासह गावातील अनेकांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून गावातील बहुतांश मुलींचे विवाह या सोहळ्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या विवाह सोहळ्यात सुमारे २० विवाह होतात. याची तयारी दीड ते दोन महिने अगोदरच ग्रामस्थ करीत असतात. विवाहसोहळ्यासाठी नावनोंदणी केलेल्या वधूपित्याकडून त्याच्या ऐपतीप्रमाणे २ ते हजारांपासून ५० हजार रूपयांची रक्कम घेतली जाते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या अनेक मुलींचे विवाह या सोहळ्यात पायलीभर गव्हावर थाटा-माटात पार पडल्याचेही कोंढेकर यांनी सांगितले.सामूहिक सोहळा असला तरी, यात वºहाडींची व्यवस्था करण्यामध्ये ग्रामस्थ कुठेही कमी नव्हते. सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. याबरोबरच भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २० ते २५ हजार वºहाडींना थंड बाटलीबंद पाणी पुरविण्यात येत होते. यासाठी सहा ट्रॅक्टर भरून पाण्याच्या बाटल्या विवाहस्थळी सज्ज होत्या.त्याचप्रमाणे मंडपातील नागरिकांना विवाह सोहळा पाहता यावा, यासाठी ठिकठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या कोंढा गावात सोमवारी १६ जोडप्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. विवाह सोहळ्यासाठी परिसरातील विविध गावांतून २० ते २५ हजार वºहाडींची उपस्थिती होती. त्यामुळे गावात जिकडे-तिकडे वºहाडींची वर्दळ दिसून येत होती. वधूपित्यांच्या घरासमोर मंडप टाकलेले होते. या मंडपात रूखवाताच्या सामानासह पै- पाहुण्यांची गर्दी होती. विवाह सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी सुमारे दोन हजारांवर ग्रामस्थ कार्यरत होते.मोठ्या संख्येने वºहाडी असताना सोहळ्यात कसलीही कमतरता जाणवत नव्हती.

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेड