शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘कोंढ्याने’ जपली सामूहिक विवाहाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:11 IST

लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देउपक्रमाची २९ वर्षे : मुलींचा विवाह अंगणातच थाटामाटात पडतोय पार

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : लग्न ही आयुष्यातील महत्त्वाची तेवढीच खर्चिक बाब झाली आहे. या विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च, पैशाची उधळपट्टी थांबवा, असे संत महात्मे सांगून गेले. मात्र ही बाब मनावर घेतली जात नाही. अशा स्थितीत अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावाने तब्बल २९ वर्षे सामूहिक विवाहाची परंपरा जपत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.सोमवारी अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे सामूहिक विवाह सोहळ्यात १६ जोडपी विवाहबद्ध झाली. या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळपासूनच कोंढ्याच्या दिशेने वºहाडींची गर्दी दिसत होती. सकाळी १०.१७ चा मुहूर्त होता. विवाह सोहळ्यासाठी गावात भव्य सभामंडप उभारण्यात आला होता. हा मंडप वºहाडींच्या गर्दीने फुलून गेला होता. पहाटेपासूनच गावातील तरूणांबरोबरच आबालवृद्ध विवाह सोहळ्याच्या लगबगीत होते. मुहूर्तावर हजारो वºहाडींच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सुमारे २० हजारांवर वºहाडींच्या भोजनाच्या पंगती पडू लागल्या. विवाहासाठी एवढी गर्दी असतानाही ग्रामस्थांच्या अचूक नियोजनामुळे कुठेही, कसलीही कमतरता नव्हती.या सोहळ्यासंदर्भात सांगताना गावातील ज्येष्ठ संभाजी पाटील कोंढेकर म्हणाले, विवाह सोहळ्यावेळी मुलीच्या वडिलांवर आर्थिक ताण येतो. अनेकजण कर्जबाजारी होतात, हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. या हेतूने २९ वर्र्षांपूर्वी कोंढा ग्रामस्थांनी एकत्रित येवून गावातील मुलींचे विवाह सामूहिक सोहळ्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी हरिभाऊ कदम, रामराव कोंढेकर, दादाराव कोंढेकर, गणेश कोंढेकर, बबन कोंढेकर, बाबूराव कोंढेकर यांच्यासह गावातील अनेकांनी पुढाकार घेतला. तेव्हापासून गावातील बहुतांश मुलींचे विवाह या सोहळ्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या विवाह सोहळ्यात सुमारे २० विवाह होतात. याची तयारी दीड ते दोन महिने अगोदरच ग्रामस्थ करीत असतात. विवाहसोहळ्यासाठी नावनोंदणी केलेल्या वधूपित्याकडून त्याच्या ऐपतीप्रमाणे २ ते हजारांपासून ५० हजार रूपयांची रक्कम घेतली जाते. आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या अनेक मुलींचे विवाह या सोहळ्यात पायलीभर गव्हावर थाटा-माटात पार पडल्याचेही कोंढेकर यांनी सांगितले.सामूहिक सोहळा असला तरी, यात वºहाडींची व्यवस्था करण्यामध्ये ग्रामस्थ कुठेही कमी नव्हते. सोहळ्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. याबरोबरच भोजनाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २० ते २५ हजार वºहाडींना थंड बाटलीबंद पाणी पुरविण्यात येत होते. यासाठी सहा ट्रॅक्टर भरून पाण्याच्या बाटल्या विवाहस्थळी सज्ज होत्या.त्याचप्रमाणे मंडपातील नागरिकांना विवाह सोहळा पाहता यावा, यासाठी ठिकठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या कोंढा गावात सोमवारी १६ जोडप्यांचा विवाह थाटामाटात पार पडला. विवाह सोहळ्यासाठी परिसरातील विविध गावांतून २० ते २५ हजार वºहाडींची उपस्थिती होती. त्यामुळे गावात जिकडे-तिकडे वºहाडींची वर्दळ दिसून येत होती. वधूपित्यांच्या घरासमोर मंडप टाकलेले होते. या मंडपात रूखवाताच्या सामानासह पै- पाहुण्यांची गर्दी होती. विवाह सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी सुमारे दोन हजारांवर ग्रामस्थ कार्यरत होते.मोठ्या संख्येने वºहाडी असताना सोहळ्यात कसलीही कमतरता जाणवत नव्हती.

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेड