शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे हजार बालके आली शिक्षणाच्या प्रवाहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:08 IST

परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.

ठळक मुद्देपटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

- अनुराग पोवळे 

नांदेड : परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून आणखी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी १५ ते ३० जून या कालावधीत राबवलेल्या पटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. जिल्ह्यात यंदा बालकांचा शिक्षण हक्क कायद्याचीही अंमलबजावणी प्रभावीरित्या झाल्यामुळे यंदा मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मोफत प्रवेश झाले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २६२ शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश मिळाला आहे. २०१३-१४ मध्ये ४९२, २०१४-१५ मध्ये ७०९, २०१५-१६ मध्ये १०५४ आणि २०१६-१७ मध्ये १०२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदा झालेल्या जनजागृतीमुळे प्रवेशाची संख्या उच्चांकी झाली आहे. 

आईवडिलांच्या रोजगार प्रश्नामुळे शाळेपासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात हंगामी वसतिगृह चालवले जातात.या वसतिगृहातही जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. हे विद्यार्थी शाळेतच राहावे या हेतूने ३१ मार्चपर्यंत वसतिगृह चालवली जातात. ही वसतिगृह मुखेड, लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू करावी लागतात.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा विशेष मोहीम जिल्ह्यात वीटभट्टी तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या १०२ विषय तज्ज्ञांमार्फत शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या साखर कारखाना परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही परिसरातच शाळा सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात आजघडीला येळेगाव, वाघलवाडा, कुंटूर, बा-हाळी, हदगाव येथील कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.