शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे हजार बालके आली शिक्षणाच्या प्रवाहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:08 IST

परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.

ठळक मुद्देपटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

- अनुराग पोवळे 

नांदेड : परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून आणखी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी १५ ते ३० जून या कालावधीत राबवलेल्या पटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. जिल्ह्यात यंदा बालकांचा शिक्षण हक्क कायद्याचीही अंमलबजावणी प्रभावीरित्या झाल्यामुळे यंदा मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मोफत प्रवेश झाले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २६२ शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश मिळाला आहे. २०१३-१४ मध्ये ४९२, २०१४-१५ मध्ये ७०९, २०१५-१६ मध्ये १०५४ आणि २०१६-१७ मध्ये १०२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदा झालेल्या जनजागृतीमुळे प्रवेशाची संख्या उच्चांकी झाली आहे. 

आईवडिलांच्या रोजगार प्रश्नामुळे शाळेपासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात हंगामी वसतिगृह चालवले जातात.या वसतिगृहातही जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. हे विद्यार्थी शाळेतच राहावे या हेतूने ३१ मार्चपर्यंत वसतिगृह चालवली जातात. ही वसतिगृह मुखेड, लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू करावी लागतात.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा विशेष मोहीम जिल्ह्यात वीटभट्टी तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या १०२ विषय तज्ज्ञांमार्फत शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या साखर कारखाना परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही परिसरातच शाळा सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात आजघडीला येळेगाव, वाघलवाडा, कुंटूर, बा-हाळी, हदगाव येथील कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.