शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:30 IST

तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

शेख इलियास ।बिलोली : तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.बिलोली तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद, तूर पिकाची शेती केली जाते़ मात्र उत्पादन खर्च अधिक, उत्पन्न कमी या प्रकारामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बडूर येथील तरुण शेतकरी श्रीनिवास जाधव यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले़ बालपणापासूनच श्रीनिवास जाधव यांना शेतीची आवड होती.वडिलोपार्जित शेतजमिनीत स्वत:च्या कल्पनेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र यावर्षी त्यांनी ३ एकर शेतीत हळदीची लागवड केली होती. त्यांना ठिबक, खत काढणी, जैविक फवारणी याकरिता ९० हजार रुपये खर्च आला तर उत्पन्न पाचपट झाले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवकृपेने दगा दिला असला तरी ३ एकरांत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले़ या उत्पन्नातून त्यांना २० लाख रुपये नफा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.आजची तरुणाई तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत असतानाच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतीवरील जीवापाड प्रेम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कापूस पीक घेणाºया शेतकऱ्यांनी श्रीनिवास जाधव यांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र शेतकरी दुष्काळीस्थितीत अडकल्याने आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतो. परंतु, हीच शेती पारंपरिक पद्धतीने केल्यास अशा परिस्थितीचा सामना करता येतो. मला बालपणापासूनच शेतीची आवड होती. मी तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील 'टर्मरिक मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तज्ज्ञांकडून या हळदीचे बेणे आणले आहे. आदर्श शेती ही नियोजनातून निर्माण करता येते.-श्रीनिवास जाधव, शेतकरी बडूर

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती