शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:30 IST

तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

शेख इलियास ।बिलोली : तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.बिलोली तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद, तूर पिकाची शेती केली जाते़ मात्र उत्पादन खर्च अधिक, उत्पन्न कमी या प्रकारामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बडूर येथील तरुण शेतकरी श्रीनिवास जाधव यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले़ बालपणापासूनच श्रीनिवास जाधव यांना शेतीची आवड होती.वडिलोपार्जित शेतजमिनीत स्वत:च्या कल्पनेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र यावर्षी त्यांनी ३ एकर शेतीत हळदीची लागवड केली होती. त्यांना ठिबक, खत काढणी, जैविक फवारणी याकरिता ९० हजार रुपये खर्च आला तर उत्पन्न पाचपट झाले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवकृपेने दगा दिला असला तरी ३ एकरांत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले़ या उत्पन्नातून त्यांना २० लाख रुपये नफा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.आजची तरुणाई तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत असतानाच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतीवरील जीवापाड प्रेम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कापूस पीक घेणाºया शेतकऱ्यांनी श्रीनिवास जाधव यांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र शेतकरी दुष्काळीस्थितीत अडकल्याने आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतो. परंतु, हीच शेती पारंपरिक पद्धतीने केल्यास अशा परिस्थितीचा सामना करता येतो. मला बालपणापासूनच शेतीची आवड होती. मी तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील 'टर्मरिक मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तज्ज्ञांकडून या हळदीचे बेणे आणले आहे. आदर्श शेती ही नियोजनातून निर्माण करता येते.-श्रीनिवास जाधव, शेतकरी बडूर

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती