शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

तीन एकरांत ६० क्विंटल हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:30 IST

तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

शेख इलियास ।बिलोली : तालुक्यात सर्वत्र कापूस, हरभरा, तूर, सोयाबीन, उडदाची शेती केली जाते़ मात्र, अलीकडच्या काळात ही शेती परवडण्याजोगी राहिलेली नाही़ त्यामुळे शेतकरी पारंपरिक ज्ञानाच्या भरवशावर इतर पिकांकडे वळत आहे. बडूर येथील श्रीनिवास जाधव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने ३ एकर शेतीत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.बिलोली तालुक्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद, तूर पिकाची शेती केली जाते़ मात्र उत्पादन खर्च अधिक, उत्पन्न कमी या प्रकारामुळे सोयाबीन, उडीद, तूर पिकामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बडूर येथील तरुण शेतकरी श्रीनिवास जाधव यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले़ बालपणापासूनच श्रीनिवास जाधव यांना शेतीची आवड होती.वडिलोपार्जित शेतजमिनीत स्वत:च्या कल्पनेतून दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र यावर्षी त्यांनी ३ एकर शेतीत हळदीची लागवड केली होती. त्यांना ठिबक, खत काढणी, जैविक फवारणी याकरिता ९० हजार रुपये खर्च आला तर उत्पन्न पाचपट झाले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या अवकृपेने दगा दिला असला तरी ३ एकरांत ६०० क्विंटल हळदीचे उत्पादन झाले़ या उत्पन्नातून त्यांना २० लाख रुपये नफा मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.आजची तरुणाई तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत असतानाच बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने शेतीवरील जीवापाड प्रेम इतर शेतकऱ्यांसाठी आदर्शवत आहे. तालुक्यातील सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, कापूस पीक घेणाºया शेतकऱ्यांनी श्रीनिवास जाधव यांचा आदर्श घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

सर्वत्र शेतकरी दुष्काळीस्थितीत अडकल्याने आत्महत्या करतोय, कर्जबाजारी होतो. परंतु, हीच शेती पारंपरिक पद्धतीने केल्यास अशा परिस्थितीचा सामना करता येतो. मला बालपणापासूनच शेतीची आवड होती. मी तेलंगणा राज्यातील विजयवाडा येथील 'टर्मरिक मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या तज्ज्ञांकडून या हळदीचे बेणे आणले आहे. आदर्श शेती ही नियोजनातून निर्माण करता येते.-श्रीनिवास जाधव, शेतकरी बडूर

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती