शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी राहणार शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे ...

ठळक मुद्देबँक खात्याशी आधार लिंक नाही: हार्ड कॉपी सादर करण्यासही टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दाखलच केली नाही़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़राज्य शासनाने २०१७-१८ पासून सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत़ त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने ई-स्कॉलरशीप वेबसाईट बंद केली़ त्याच दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर हजारो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक झाले नाही़ त्यामुळे प्रशासनाने आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, भटक्या समाजासाठीच्या योजनांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत़ २०१६-१७ मधील हे प्रस्ताव प्रलंबित शिष्यृवत्तीच्या यादीत टाकण्यात आले़ याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या़त्यावर समाजकल्याण विभागाने ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले नाही़ त्यांचा समावेश प्रलंबित शिष्यवृत्तीत करुन त्यांच्या आॅनलाईन प्रस्तावांची हार्ड कॉपी व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे निर्देश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले होते़ प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी महा-ई-स्कूल पोर्टल सुरु करण्यात आले होते़ शाळांच्या प्रतिनिधींनी महा-ई-स्कूल पोर्टलचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्याचबरोबर हार्ड कापी व लिंकची पावती समाजकल्याण विभागात जमा करणे आवश्यक होते़, परंतु अनेक शाळांनी त्याबाबत चालढकल केली़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु-कुंभारगावे४विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज संकेतस्थळावरुन १५ डिसेंबरपर्यंत समाजकल्याण विभागात पाठवावे़ प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी २०१५-१६ साठी ३१ मार्च २०१६ तर २०१६-१७ करिता ३१ मार्च २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांना अद्याप शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही़ अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज पाठवावेत़ २०१३-१४ ते आतापर्यंत सर्व शिष्यवृत्तीचा अहवाल व इतर माहिती शाळेने स्वत: काढून ठेवावी, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी ए़बीक़ुंभारगावे यांनी केले आहे़