शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी राहणार शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे ...

ठळक मुद्देबँक खात्याशी आधार लिंक नाही: हार्ड कॉपी सादर करण्यासही टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्ह्यातील अनेक शाळांनी प्रलंबित शिष्यवृत्ती प्रस्तावांची हार्ड कॉपी व लिंकची पावती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दाखलच केली नाही़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़राज्य शासनाने २०१७-१८ पासून सर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत़ त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने ई-स्कॉलरशीप वेबसाईट बंद केली़ त्याच दरम्यान महाडीबीटी पोर्टलवर हजारो विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यांशी लिंक झाले नाही़ त्यामुळे प्रशासनाने आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती, भटक्या समाजासाठीच्या योजनांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले आहेत़ २०१६-१७ मधील हे प्रस्ताव प्रलंबित शिष्यृवत्तीच्या यादीत टाकण्यात आले़ याबाबत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या़त्यावर समाजकल्याण विभागाने ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले नाही़ त्यांचा समावेश प्रलंबित शिष्यवृत्तीत करुन त्यांच्या आॅनलाईन प्रस्तावांची हार्ड कॉपी व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे निर्देश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले होते़ प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी महा-ई-स्कूल पोर्टल सुरु करण्यात आले होते़ शाळांच्या प्रतिनिधींनी महा-ई-स्कूल पोर्टलचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या़ त्याचबरोबर हार्ड कापी व लिंकची पावती समाजकल्याण विभागात जमा करणे आवश्यक होते़, परंतु अनेक शाळांनी त्याबाबत चालढकल केली़ त्यामुळे हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़ई-स्कॉलरशीप पोर्टल सुरु-कुंभारगावे४विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता आदी लाभ देण्याचे प्रलंबित असल्याने ई-स्कॉलरशीप हे संकेतस्थळ मर्यादित कालावधीसाठी सुरु करण्यात आले आहे़ विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज संकेतस्थळावरुन १५ डिसेंबरपर्यंत समाजकल्याण विभागात पाठवावे़ प्रथम टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी २०१५-१६ साठी ३१ मार्च २०१६ तर २०१६-१७ करिता ३१ मार्च २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज भरले आहेत, परंतु ज्यांना अद्याप शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही़ अशा विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज पाठवावेत़ २०१३-१४ ते आतापर्यंत सर्व शिष्यवृत्तीचा अहवाल व इतर माहिती शाळेने स्वत: काढून ठेवावी, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी ए़बीक़ुंभारगावे यांनी केले आहे़